शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

नाना म्हणाले, उद्धवा अजब तुझे सरकार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:09 IST

पुणे : 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार'... या गदिमांच्या गीताच्या ओळी गुणगुणत प्रसिद्ध अभिनेते ...

पुणे : 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार'... या गदिमांच्या गीताच्या ओळी गुणगुणत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘हे गदिमांनी कधी लिहून ठेवलं आहे...अशी मिश्किल टिप्पणी केली; पण पुणेकरांना त्यांचा हा मिश्कील भाव काहीशा विलंबाने कळला आणि काही क्षणांतच सभागृहामध्ये हशा पिकला. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला गदिमा पुरस्कार मिळालाच आहे. कविता, कथा आणि गाण्यांच्या रूपात तो मिळाल्याने मीही पुरस्कृत झालो. आता त्यांच्या नावाचा पुरस्कार हा मूर्त स्वरूपात मिळालाय इतकंच, असे भावोद्गार त्यांनी काढले.

गदिमा प्रतिष्ठानतर्फे महान कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनी नाना पाटेकर यांना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार, संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार; तर युवा गायिका रश्मी मोघे यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण त्यासाठी लायक आहोत की, नाही याची कारणमीमांसा आपण करायची नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे आपण लायक आहोत असे समजायचे, असे सांगून भाषण सुरू होण्यापूर्वीच नानांनी षट्कार ठोकला. माझा पिंड शब्द लक्षात ठेवणारा नाही; पण आई काही गुणगुणायची तेव्हा समजले की गदिमा किती मोठे कवी आहेत. ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ’एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात’, ’जाळीमंदी पिकली करवंद’, ’विठ्ठला तू वेडा कुंभार’ अशी सर्व रसांना स्पर्श करणारी गीते लिहिणारे गदिमा लोकविलक्षणच होते. मराठीत क्लिष्ट लिहिणाऱ्या लोकांचा गौरव काहींनी केला; पण गदिमांचे कौतुक सर्व स्तरांतील लोकांनी केले, असे नानांनी आवर्जून सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप भरून आले आहे. इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा ही माहेरची मिळालेली थाप खूप मोलाची आहे, अशी भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली.

गदिमांचे चांगले चरित्र पुस्तक आतापर्यंत का निर्माण झाले नाही, याकडे डॉ. सदानंद मोरे यांनी लक्ष वेधले. तुम्ही कोणीही असा; पण तुम्हाला गदिमा आवडत असणारंच. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई, लाहोर आणि कोलकाता अशी चित्रपट केंद्रे होती. फाळणीनंतर लाहोरचे लोक मुंबईत आले. भारदस्त पंजाबी लोकांमुळे मुंबईतील मराठी माणसाच्या चित्रपट क्षेत्रातील अस्तित्वाला धक्का बसला. त्यानंतरच्या काळात मराठी कलाकारांनी देशपातळीवर छाप उमटवली, अशामध्ये नानांचे स्थान वरचे आहे. ते स्वबळावर घडलेले अभिनेते आहेत असे नानांविषयी गौरवोद्गारही मोरे यांनी काढले.

रश्मी मोघे आणि सहका-यांनी गदिमा गीते सादर केली. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात शंभर गुण प्राप्त करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना गदिमा पारितोषिक देण्यात आले. अमृतमहोत्सवानिमित्त प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि निवेदक अरुण नूलकर यांचा सत्कार केला. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. राम कोल्हटकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड