शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाना म्हणाले, उद्धवा अजब तुझे सरकार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:09 IST

पुणे : 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार'... या गदिमांच्या गीताच्या ओळी गुणगुणत प्रसिद्ध अभिनेते ...

पुणे : 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार'... या गदिमांच्या गीताच्या ओळी गुणगुणत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘हे गदिमांनी कधी लिहून ठेवलं आहे...अशी मिश्किल टिप्पणी केली; पण पुणेकरांना त्यांचा हा मिश्कील भाव काहीशा विलंबाने कळला आणि काही क्षणांतच सभागृहामध्ये हशा पिकला. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला गदिमा पुरस्कार मिळालाच आहे. कविता, कथा आणि गाण्यांच्या रूपात तो मिळाल्याने मीही पुरस्कृत झालो. आता त्यांच्या नावाचा पुरस्कार हा मूर्त स्वरूपात मिळालाय इतकंच, असे भावोद्गार त्यांनी काढले.

गदिमा प्रतिष्ठानतर्फे महान कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनी नाना पाटेकर यांना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार, संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार; तर युवा गायिका रश्मी मोघे यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण त्यासाठी लायक आहोत की, नाही याची कारणमीमांसा आपण करायची नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे आपण लायक आहोत असे समजायचे, असे सांगून भाषण सुरू होण्यापूर्वीच नानांनी षट्कार ठोकला. माझा पिंड शब्द लक्षात ठेवणारा नाही; पण आई काही गुणगुणायची तेव्हा समजले की गदिमा किती मोठे कवी आहेत. ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ’एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात’, ’जाळीमंदी पिकली करवंद’, ’विठ्ठला तू वेडा कुंभार’ अशी सर्व रसांना स्पर्श करणारी गीते लिहिणारे गदिमा लोकविलक्षणच होते. मराठीत क्लिष्ट लिहिणाऱ्या लोकांचा गौरव काहींनी केला; पण गदिमांचे कौतुक सर्व स्तरांतील लोकांनी केले, असे नानांनी आवर्जून सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप भरून आले आहे. इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा ही माहेरची मिळालेली थाप खूप मोलाची आहे, अशी भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली.

गदिमांचे चांगले चरित्र पुस्तक आतापर्यंत का निर्माण झाले नाही, याकडे डॉ. सदानंद मोरे यांनी लक्ष वेधले. तुम्ही कोणीही असा; पण तुम्हाला गदिमा आवडत असणारंच. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई, लाहोर आणि कोलकाता अशी चित्रपट केंद्रे होती. फाळणीनंतर लाहोरचे लोक मुंबईत आले. भारदस्त पंजाबी लोकांमुळे मुंबईतील मराठी माणसाच्या चित्रपट क्षेत्रातील अस्तित्वाला धक्का बसला. त्यानंतरच्या काळात मराठी कलाकारांनी देशपातळीवर छाप उमटवली, अशामध्ये नानांचे स्थान वरचे आहे. ते स्वबळावर घडलेले अभिनेते आहेत असे नानांविषयी गौरवोद्गारही मोरे यांनी काढले.

रश्मी मोघे आणि सहका-यांनी गदिमा गीते सादर केली. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात शंभर गुण प्राप्त करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना गदिमा पारितोषिक देण्यात आले. अमृतमहोत्सवानिमित्त प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि निवेदक अरुण नूलकर यांचा सत्कार केला. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. राम कोल्हटकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड