शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जेवणाच्या ताटात हात घातला म्हणून खून; नियोजनपूर्वक खून केला आहे का? पोलिसांचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:12 IST

धायरीतील तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

पुणे : तरुणाचा खून प्रकरणात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून, त्यांनी नियोजनपूर्वक खून केला आहे का, त्यामागे उद्देश काय होता, तसेच अन्य कोणाचा सहभाग आहे का?, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले. दरम्यान, दारू प्यायल्यानंतर जेवणाच्या ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून धायरी रस्त्यावर तरुणाला बांबू व दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आदित्य संतोष घोरपडे (वय २३, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश उर्फ नन्या राकेश शुक्ला उर्फ परदेशी (वय ३२), जगदीश राकेश शुक्ला (वय २१) आणि रोहन उर्फ मारी राजू शेळके (वय २५, तिघे रा. धायरी) यांना पोलिस कोठडी झाली आहे. तर, या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. मृत तरुणाच्या आईने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास धायरी रस्त्यावरील लाडली साडी सेंटरच्या जवळ त्रिमूर्ती किराणा मालाच्या दुकानासमोर घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेली रिक्षा कोठे लपवून ठेवली आहे, तसेच, मारहाण करण्यासाठी बांबू कोठून आणले, याबाबत चौकशी करायची आहे आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा करायचे आहेत. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अतुल भोस आणि सहायक सरकारी वकील बोधिनी शशिकला यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकCourtन्यायालयDeathमृत्यू