शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या ...

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरी गेली तरी आपल्याला संधी निश्चित मिळेल या आशेने अनेकांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे.

चौकट

सध्याची पालिकेतील स्थिती (नगरसचिव कार्यालयातील नोंद)

भाजप : ९७

राष्ट्रवादी काँग्रेस : ४२

काँग्रेस : १०

शिवसेना : १०

मनसे : २

एआयएमआयएम : १

( दोन जागा रिक्त (दिवंगत सदस्य))

चौकट

१६६ ते १६८ नगरसेवक

“नवीन तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शहरात साधारणतः ५५ ते ५६ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १६६ ते १६८ होणार आहे. एका प्रभागात सुमारे ५४ ते ६३ हजार मतदार राहणार असून, प्रत्येकाला तीन उमेदवारांना मतदान करायचे आहे.

चौकट

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

“राज्य सरकारने तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यंत अनुकूल स्थिती भारतीय जनता पक्षासाठी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन सदस्यांचा प्रभाग व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. २०२२ च्या निवडणुकीत 'अब की बार सौ पार ' असेच चित्र निश्चित पाहायला मिळेल.”

-गणेश बिडकर, भाजपा

-----

“तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन, येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल व महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल.”

-दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी

------

“सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना काँग्रेस महापालिकेत सत्तेवर आली होती. यावेळीही तीनचा प्रभाग रचना झाल्याने आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून महापालिकेत पुन्हा काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास आहे.”

-आबा बागूल, कॉंग्रेस

------

“२००२ च्या निवडणुकीत तीनचा प्रभाग असताना शिवसेनेला २१ जागा मिळाल्या होत्या. आता पुन्हा तीनचा प्रभाग झाल्याने शिवसेनेला शहरात चांगले यश मिळेल असा विश्वास आहे. महाविकास आघाडीने तीनचा प्रभाग केल्याचे आम्ही स्वागत करतो.”

-पृथ्वीराज सुतार, शिवसेना

------

“दोन सदस्यीय प्रभाग असताना मनसेचे २८ नगरसेवक महापालिकेत होते. तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे आम्ही स्वागत करतो, ही रचना नक्कीच मनसेची संख्या शहरात वाढवेल व पुण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच ठरवेल.”

-साईनाथ बाबर, मनसे

--------