शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

"हाथरस प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी डागली योगी सरकार टीकेची तोफ; म्हणाले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 13:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे...

पुणे : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात असंतोषाचे आहे. तसेच या प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर विरोधी पक्षांकडून टीकेची तोफ डागल्या जात आहे. आता हाथरस प्रकरणावरून शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील योगी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

खासदार अमोल कोल्हे हाथरस बलात्कार प्रकरणावर म्हणाले, ' ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा करावा तितका निषेध कमीच आहे. परंतू, उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कुणाच्या आड लपत राजकारण करणे थांबवले पाहिजे. तसेच भाजपने ज्या ज्या ठिकाणी त्यांचे सरकार आहे, तिथे सर्व माता भगिनींना सुरक्षित वातावरण कसे मिळेल याची काळजी घेतली ते  जास्त योग्य राहील.  

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून योगी सरकार विरोधात चांगलेच रान उठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

..........

हाथरस बलात्कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया ... 

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. 

 

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून योगी सरकार विरोधात चांगलेच रान उठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.         

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेyogi adityanathयोगी आदित्यनाथHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार