शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"हाथरस प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी डागली योगी सरकार टीकेची तोफ; म्हणाले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 13:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे...

पुणे : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात असंतोषाचे आहे. तसेच या प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर विरोधी पक्षांकडून टीकेची तोफ डागल्या जात आहे. आता हाथरस प्रकरणावरून शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील योगी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

खासदार अमोल कोल्हे हाथरस बलात्कार प्रकरणावर म्हणाले, ' ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा करावा तितका निषेध कमीच आहे. परंतू, उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कुणाच्या आड लपत राजकारण करणे थांबवले पाहिजे. तसेच भाजपने ज्या ज्या ठिकाणी त्यांचे सरकार आहे, तिथे सर्व माता भगिनींना सुरक्षित वातावरण कसे मिळेल याची काळजी घेतली ते  जास्त योग्य राहील.  

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून योगी सरकार विरोधात चांगलेच रान उठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

..........

हाथरस बलात्कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया ... 

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. 

 

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून योगी सरकार विरोधात चांगलेच रान उठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.         

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेyogi adityanathयोगी आदित्यनाथHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार