शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आंदोलन : डॉ़ राजेंद्र सिंह; पुण्यात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:54 PM

साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.

ठळक मुद्देडॉ. राजेंद्र सिंह यांना चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १६ वा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन जलप्रदूषणविरोधी व जलजागृतीची चळवळ उभारावी : राजेंद्र सिंह

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी नमामी गंगा योजनेची घोषणा केली़ या घोषणेमुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या; परंतु आता साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.पाणी अडवणे, साठविणे आणि जिरविणे, याबाबत डॉ. राजेंद्र सिंह यांनी केलेल्या कार्याबद्दल चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १६ वा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार’ त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता, उपाध्यक्ष श्रीधर गायकवाड, पुणे पीपल्स को. आॅप. बँकेचे उपाध्यक्ष सुभाष नडे, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया व किशोर धारिया आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ़ राजेंद्र सिंह म्हणाले, गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता़ हा निधीही उपलब्ध झाला. मात्र, त्यापैकी केवळ साडेतीन टक्केच निधी खर्च करण्यात आला. याप्रकरणी कॅगसह अनेक संस्थांनी ताशेरेही ओढले आहेत़ सध्या देशात खोटी कामे आणि आश्वासनांबाबत रेटून बोलले जात आहे़ देशात खºयाचे खोटे आणि खोट्याचे खरे बोलण्याची हुशारी या देशात यापूर्वी कधीही दिसली नव्हती, अशी टीका यांनी केली़ आपण आजपर्यंत लोकसहभागातून जलसंधारणाची ११ हजार ८०० कामे केली आहेत़ त्यानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन जलप्रदूषणविरोधी व जलजागृतीची चळवळ उभारावी, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले़ 

लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवाडॉ. साळुंखे यांच्या जीवनाबद्दल सांगताना शरद पवार यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेख केला. पवार म्हणाले, साळुंखे यांनी शिकवणीला आलेल्या मुलीशी लग्न करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यामुळे पालकांनी मुलींना शिकवणीला पाठविताना लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवा, असा गमतीशीर सल्लाही पवारांनी दिला.

दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्प पुरेसा नाही. तर मोठी धरणे ही फक्त टक्केवारी व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहेत. त्याची कामे कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामध्ये पर्यावरण व शेतकऱ्यांचेच नुकसान होते. म्हणूनच जलसंधारणाबरोबरच पाण्याचे कायमस्वरूपी शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न केले नाहीत, तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही़ - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे