शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह ऐन थंडीत वाहन चालकांचा काढतेय घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:31 IST

वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना ऐन थंडीत ही घाम निघत आहे.

धनकवडी : बारमाही वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या भारती विद्यापीठामागील त्रिमूर्ती चौकातील वाहतुकीच्या समस्यांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. वाहतूक आराखड्यानुसार चौकाचा आकार वाढवण्यात यावा, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयासह महापालिकेला देऊन तब्बल दहा वर्षे झाले, तरीही कोणतीच उपाययोजना महापालिकेने केली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना ऐन थंडीत ही घाम निघत आहे.आकाराने अत्यंत लहान असणाऱ्या या चौकाचा वापर दिवसभरात सुमारे पन्नास हजार दुचाकी आणि चारचाकी वाहने करतात. इंग्रजी एक्स असा विचित्र आकार असलेल्या चौकातील वाहतूक नियमन करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेले नाही. चौकातील वाहतूक कोंडीला नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्यातच चौकाच्या धोकादायक कोपऱ्यावरील दुकानासमोर उसाचा रस पिणारे आपली वाहने रस्त्यावर उभा करून गर्दी करत आहेत. वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांना शिस्त लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालक करीत आहेत.रस्ता रुंदीकरणासाठी पीआयसीटी महाविद्यालयाने जागा दिल्यामुळेच त्रिमूर्ती चौक ते धनकवडीचा कानिफनाथ चौकाला जोडणारा रस्ता अस्तित्वात आला. त्रिमूर्ती चौक थेट तीन हत्ती चौकाला जोडला गेल्यामुळे आंबेगावसह भारती विद्यापीठ, सहकारनगर आणि शहराशीही हक्काच्या रस्त्याने जोडले गेले. पीआयसीटी या शिक्षण संस्थेने लाखो नागरिकांवर केलेल्या उपकाराची परतफेड चौकातील दुकानदारांनी मात्र अपकाराने केली आहे.

भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा चौक, त्रिमूर्ती चौक, सरहद्द चौक हा परिसर गेली दहा वर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला आहे. विविध शाळा, आयटी कंपनी, खाजगी बसच्या जवळपास शंभर एक बस रोज या रस्त्यावरून ये - जा करतात. आंबेगाव, दत्तनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे काँक्रीट मिक्सर आणि ट्रकची ये - जा सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारती विद्यापीठातून जाणाऱ्या नागरिकांच्या हक्काचा रस्ता बंद झाला. - मोहिनी देवकर, स्थानिक नागरिक 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी