शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

दत्तगड परिसरात फुलली पंधरा हजारांहून अधिक देशी झाडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : चार वर्षांपूर्वी दिघीतील डोंगर म्हणजेच दत्तगडावर मोकळं रान होतं. पण तिथं येणाऱ्यांनी वनराई साकारण्याचा निर्धार केला ...

पुणे : चार वर्षांपूर्वी दिघीतील डोंगर म्हणजेच दत्तगडावर मोकळं रान होतं. पण तिथं येणाऱ्यांनी वनराई साकारण्याचा निर्धार केला आणि सलग शंभर दिवस वृक्षारोपणासाठी मेहनत घेतली. पण नंतर सर्वांना आवड निर्माण झाली आणि हा उपक्रम कायमच सुरू ठेवला. म्हणूनच संस्थेचे नावही ‘अविरत श्रमदान’ असेच ठेवले आहे. आजअखेर डोंगराच्या परिसरात सुमारे १५ हजारांहून अधिक देशी झाडं फुलत आहेत.

दिघीच्या डोंगराला काह्यगिरी असेही नाव आहे. ‘अविरत श्रमदान’च्या टीममध्ये ॲड. सुनील कदम, जितेंद्र माळी, धनाजी पाटील, मोहन कदम, धनंजय अंबिके आदींचा समावेश आहे. दोनशेहून अधिक जणांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये रोपांसाठी खड्डे खोदणे, रोपं लावणं, त्यांना जगविणे आदी कामे होत आहेत. झाडं वाढल्यानेे अनेक पक्षीही येऊ लागले आहेत. पक्ष्यांचे खाद्य असणारी झाडं असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. सध्या तुती मोठ्या प्रमाणावर फुलली आहे. डोंगराचा परिसर आर्मीचा आहे. संस्थेकडून चांगले काम होत असल्याने त्यांना या ठिकाणी झाडं लावण्याची परवानगी दिली.

—————————————

देशी झाडांची लागवड

उन्हाळ्यात येथे पाण्याची सोय नव्हती. तेव्हा कॅनने पाणी आणून या झाडांना जगविले. त्यानंतर काही संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी टाक्या ठेवून पाइपने पाण्याची सोय केली. आता सुमारे पंधरा हजार झाडं चांगली वाढली आहेत. त्यात वड, पिंपळ, करंज, शिवण, तुळसाचे बेट, कडुनिंब अशी देशी झाडे आहेत, असे धनाजी पाटील यांनी सांगितले.

———————————

आम्ही झाडं लावल्यानंतर अनेकदा जनावरं ती मोडायची, तेव्हा मोडलेली झाडंही आम्ही जगवली आहेत. माणूस जखमी झाला तर आपण त्यावर उपचार करतो. तसेच झाडं कोलमडली, पडली, तर त्यांना आम्ही मलमपट्टी करून जगवतो. अशी अनेक झाडं जगली आहेत. त्यांना एका काठीने बांधून उभे केले जाते.

- जितेंद्र माळी, अविरत श्रमदान

———————————-

झाडं लावणं सोपं काम आहे. पण ती जगवणं खूप कठीण आहे. आम्ही रोपं लावली आणि ती जगवली. या झाडांमुळे डोंगरावरील माती थोपून राहिली आहे. अन्यथा पूर्वी ही माती थेट खाली यायची. तसेच डोंगराच्या आजूबाजूच्या घरांमधील बोअरला डिसेंबरपर्यंत पाणी असायचे. त्यानंतर पाणी बंद व्हायचे. आता या झाडांमुळे जलस्तर वाढला आहे. बोअरला बारा महिने पाणी राहत आहे.

- ॲड. सुनील कदम, अविरत श्रमदान

———————————-