शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा भागवतांसाठी मोहन धारियांनी दिला होता राजीनामा

By राजू इनामदार | Updated: December 9, 2025 10:10 IST

- अ. भा. साहित्य महामंडळाचा इतिहास : उलगडणार पडद्याआडच्या अनेक गोष्टी 

पुणे : मोहन धारिया पुण्यातील अ. भा. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत असे समजल्यावर तत्कालीन मावळत्या संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी संमेलनस्थळी नव्या अध्यक्षांकडे सूत्रे सोपवण्यासाठी येणारच नाही अशी जाहीर भूमिका घेतली. तेव्हाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री मोहन धारिया यांना ही बाब समजताच त्यांनी दिल्लीतूनच आपल्या स्वागताध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, असा त्यांचा ऋजू स्वभाव होता.

अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या इतिहासातून मराठी साहित्य संमेलनाच्या पडद्याआड घडलेल्या अनेक गोष्टी ग्रंथरूपात उलगडणार आहेत. महामंडळात कार्यकर्ता ते पदाधिकारी असलेले प्रा. कौतिकराव ठाले पाटील हे ग्रंथ लिहित आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ठाले पाटील यांच्यावर ग्रंथलेखनाची जबाबदारी सोपवली आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मोहन धारिया यांच्या राजीनाम्याची गोष्ट सांगितली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी विदर्भ, मराठवाडा, कोकण, पुणे येथे प्रदेश प्रातिनिधित्व करणाऱ्या मराठी साहित्य शाखांचे काम सुरू होते. प्रत्येकाचे नियम, मराठी भाषेचे व्याकरण, लिखित भाषेची भूमिका वेगळी होता. पुण्याची भाषा विदर्भाला मान्य नव्हती तर विदर्भावर असलेला हिंदी भाषेचा पगडा मराठवाड्याला मान्य नव्हता. पुणेकरांचा आमचीच भाषा म्हणजे प्रमाण भाषा हे तर अनेकांना मान्य नव्हते. त्यावरून व्याकरणाचे, मांडणीचे, लिहिण्याच्या पद्धतीचे वाद होऊ लागले.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर साहित्य विषयक काम करणाऱ्या सर्व शाखांचे एकत्रीकरण व्हावे असे वाटले. त्यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना तशी विनंती केली. पोतदार यांनी परिश्रमपूर्वक काही नियम तयार केले. त्यातूनच १९६१ मध्ये अ. भा. साहित्य महामंडळाची स्थापना झाली. तोपर्यंत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनांची जबाबदारी स्वीकारणे व मराठी भाषेसंबधी काम करणे ही दोन महत्त्वाची कामे महामंडळाने ठरवून घेतली. महामंडळाचे मुख्य कार्यालय फिरते राहील वगैरे गोष्टीही ठरल्या. त्याप्रमाणे आजही काम सुरू आहे. याचा अभ्यासपूर्ण वेध या नियोजित ग्रंथात समाविष्ट असेल. एक संदर्भग्रंथ असे तर त्याचे स्वरूप असेल शिवाय ते रंजक व वाचनीय करण्याचाही प्रयत्न आहे, असे प्रा. ठाले म्हणाले.

वादविषय झालेल्या अनेक संमेलनांमुळे बरेच काही घडले आहे, त्यावेळीही बरेच काही घडतच होते. पहिल्या संमेलनातील न्यायमूर्ती रानडे व महात्मा फुले यांच्यातील पत्रव्यवहारापासून ते आतापर्यंतच्या सर्व गोष्टी यात असतील. यातून बरेच काही चांगलेही झाले आहे. काही भाग लिहूनही झाले आहेत. अनेकांबरोबर बोलून, प्रत्यक्ष भेट घेऊन, मुलाखती घेत व उपलब्ध कागदपत्रे वाचून, अभ्यासून या ग्रंथलेखनाचे काम सुरू आहे.  - प्रा. कौतिकराव ठाले पाटील

English
हिंदी सारांश
Web Title : Mohan Dharia Resigned for Durga Bhagwat: A Literary Stand

Web Summary : Mohan Dharia resigned as chairman of a literary event after Durga Bhagwat opposed his selection. A book will reveal untold stories behind Marathi literary conferences, including disputes over language standardization and the establishment of the Akhil Bharatiya Sahitya Mahamandal.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे