शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

अजून नाराज आहात का?; वसंत मोरे हसत म्हणाले, "घरातली भांडणं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 2:22 PM

MNS Vasant More : आज मनसेचा झेंडा हाती घेऊन आणि घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी रवाना झाले. यानंतर आता त्यांनी सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे - राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कट्टर समर्थक आणि मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं होतं. यानंतर आज मनसेचा झेंडा हाती घेऊन आणि घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी दाखल झाले. आता त्यांनी सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

अजून नाराज आहात का? असा प्रश्न विचारताच वसंत मोरे यांनी हसत आपलं मत व्यक्त केलं आहे. "घरातली भांडणं आहेत... ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व" असं म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी मनात अजून नाराजी आहे का? य़ावर बोलताना "नाराजी असण्याचं काही कारण नाही. जे आहे ते आहे. मी काल सांगितलं मला जे बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं ते मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालो. दखल घेतली नाही तर घ्यायला लावू. साहेबांच्या तब्येतीचा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. घरातली भांडणं आहेत... ती बसून जर कोणाला वाटत असेल खरंच मिटवायची तर बसून बोलतील आणि मिटेल सर्व" असं म्हटलं आहे. 

"कोणकोणाच्या सातबाऱ्यात आलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं हा पक्षवाढीचा विषय आहे. पक्षामध्ये होणाऱ्या कारवाईचा विषय आहे. त्यामुळे तो मिटू शकतो. सभा नेहमीप्रमाणेच जोशपूर्णच होती, तुम्ही सर्वांनी पाहिली, अनुभवली, मला वाटतं साहेबांचं दुखणं बरं झाल्यावर अजून जोशाने काम होईल. टीका या होतच असतात. मी मागे म्हणालो होतो. सर सलामत तो पगडी पचास. साहेब चांगेल राहिले तर आम्ही सगळे चांगले राहू. साहेबांनी स्वत:च्या तब्येतील महत्त्व दिल्याने मला आनंद झाला आहे" अशा शब्दांत वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

राज ठाकरे यांच्या भाषणाआधी सर्वांची भाषणं झाली पण तात्या कधी बोलणार याची सर्वजण वाट पाहत होते. पण त्यांचं भाषण झालं नाही. यावर वसंत मोरे यांनी तात्या योग्य वेळी बोलतात आणि सर्व त्यांचं ऐकतात असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. याच दरम्यान त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं असं म्हणत निशाणा साधला आहे. "आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण