शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लावला बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 14:20 IST

अल्पवयीन नवरीने जेजुरीच्या खंडोबारायानगरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले.

ठळक मुद्देमाता न तू वैरिणी : आईसह सहा जणांवर गुन्हा दाखल

दौंड :  दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण  करून  तिचा बळजबरीने विवाह करणाऱ्या आई, मामासह  नवरदेवाला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन नवरीने जेजुरीच्या खंडोबारायानगरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईसह नातेवाइकांनाही अटक केली.अटक केलेल्यांची नावे अशी : आई- सविता खरात (४२), मामा- शिवाजी चितळकर (४२, दोघेही रा. मलठण, ता. दौंड ), नवरा- रमेश घुले (वय २५, रा. कापडगाव , ता. खंडाळा, जि. सातारा), सिंधू ठवरे (वय ५३, रा. पिंपळे , ता. इंदापूर) तर दादा घुले (वय ५०) आणि अलका घुले (वय ४५, दोघेही रा.  कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे दोघे बेपत्ता झाले आहेत. दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीला पुण्यातील बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीला पुणे येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.  पीडित मुलीची आई सविता खरात हिच्यासह  मलठण (ता. दौंड ) येथे मामाच्या घरी राहत आहे. त्यामुळे पीडित मुलगीही मलठण येथील दादोजी कोंडदेव विद्यालयात शिक्षण घेत होती. तिने नुकतीच ९ वी ची परीक्षा  होती.  तिला दहावीचे शिक्षण घ्यायची इच्छा होती. मात्र, तोपर्यंत सहा जून रोजी दुपारी १ वाजता तिचे मामा शिवाजी चितळकर, मामाची मावशी सिंधू ठवरे, आई सविता खरात यांनी तिला बोलावून  घेतले आणि गावाला जाण्याच्या बहाण्याने तिला  कापडगाव (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथे एका इसमाच्या घरी नेले. तेथे त्याच दिवशी मामा आणि आई ने  रमेश घुले (वय २५ , रा. कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा)  याच्या घरी नेले व त्याच्याशी तिचे लग्न ठरवले असून, आजच लग्न लावणार असल्याचे सांगितले.त्यावेळी पीडित मुलीने विरोध केला.  मी १५ वर्षांची असताना दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या २५ वर्षांच्या मुलाबरोबर लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले. मात्र  तू अशीच बोलणार असल्यानेच तिला काही न सांगता थेट लग्नाला घेऊन आल्याचे सांगत नातेवाइकांनी दमदाटी केली. तिने नवरदेव आणि त्याच्या घरच्यांनाही विनवणी केली, मात्र त्यांनीही तिचे न ऐकता त्याच दिवशी लग्न केले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार  (७ जून) नवरा आणि पीडित तसेच त्याचे नातेवाईक जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यावर मुलीने जेजुरी गडावरून पळ काढला आणि एसटीने दौंड गाठले व थेट पोलिसात येऊन आई व नवऱ्यासह नातेवाइकांची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न