शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:24 IST

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : पुणे- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करत सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू केला आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारकडे दोन महिन्यात जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. 

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

"ओबीसी समाजासाठी काम करण्याचे मला वेड लागले आहे. तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा, दोन दिवसात करा किंवा १५ दिवसात करा. तुम्ही ५० टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करमार मग सगळ्यांचे करा. मला आनंद आहे करा तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातीची जातीय जनगणना करा, अशी मागणी मंत्री थगन भुजबळ यांनी केली. 

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद असल्याचे बोलले जात होते. आधी भुजबळ यांनी समसमान जागा वाटपाची मागमी केली होती, तेव्हा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना जागावाटपाबाबत उघड न बोलण्याचा इशारा दिला होता, यावर बोलताना भुजबळ म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद नाही. तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून ठरवतील. जितकी ताकद असेल तसे जागा वाटप होईल, असंही भुजबळ म्हणाले. 

" नरेंद्र मोदी यांचे वारे सगळीकडे आहे, तेच निवडून येतील. महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आथा आमचाच महायुतीचा मुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे आहेत, ते आमचेच आहेत,असंही भुजबळ म्हणाले.   

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार

१४ जानेवारीपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही राज्यभरात दौरे करतोय. ५० हजार नागरिकांच्या मतदानाचा विचार केला तर २०२४ मध्ये पंतप्रधान कोण हवेत तर ४७ हजार ४१२ लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत असं म्हटलं. मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बळ, या राज्यातील संपूर्ण समाज मोदींच्या नेतृत्वाखाली भारत निर्माण होण्यासाठी पाठिशी उभा आहे. जसजसं मोदींच्या नावाचं वादळ महाराष्ट्रात येईल तसतसं महायुतीच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी निमंत्रण येत आहेत. महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण