शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:24 IST

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : पुणे- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करत सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू केला आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारकडे दोन महिन्यात जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. 

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

"ओबीसी समाजासाठी काम करण्याचे मला वेड लागले आहे. तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा, दोन दिवसात करा किंवा १५ दिवसात करा. तुम्ही ५० टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करमार मग सगळ्यांचे करा. मला आनंद आहे करा तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातीची जातीय जनगणना करा, अशी मागणी मंत्री थगन भुजबळ यांनी केली. 

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद असल्याचे बोलले जात होते. आधी भुजबळ यांनी समसमान जागा वाटपाची मागमी केली होती, तेव्हा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना जागावाटपाबाबत उघड न बोलण्याचा इशारा दिला होता, यावर बोलताना भुजबळ म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद नाही. तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून ठरवतील. जितकी ताकद असेल तसे जागा वाटप होईल, असंही भुजबळ म्हणाले. 

" नरेंद्र मोदी यांचे वारे सगळीकडे आहे, तेच निवडून येतील. महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आथा आमचाच महायुतीचा मुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे आहेत, ते आमचेच आहेत,असंही भुजबळ म्हणाले.   

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार

१४ जानेवारीपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही राज्यभरात दौरे करतोय. ५० हजार नागरिकांच्या मतदानाचा विचार केला तर २०२४ मध्ये पंतप्रधान कोण हवेत तर ४७ हजार ४१२ लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत असं म्हटलं. मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बळ, या राज्यातील संपूर्ण समाज मोदींच्या नेतृत्वाखाली भारत निर्माण होण्यासाठी पाठिशी उभा आहे. जसजसं मोदींच्या नावाचं वादळ महाराष्ट्रात येईल तसतसं महायुतीच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी निमंत्रण येत आहेत. महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण