शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

#Metoo : तरुण म्हणतात चळवळ चांगली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:34 IST

मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली.

पुणे : हाॅलिवूडमधून सुरु झालेली मी टू ही चळवळ जगभरात पसरत अाहे. भारतातही या चळवळीमुळे अनेक महिला पुढे येऊन अापल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत अाहेत. या चळवळीतून स्त्रीयांना एक प्लॅटफाॅम मिळत असून त्यांच्यात हिम्मत तयार हाेत अाहे. या मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली. 

    प्रसादला वाटतं की साेशल मिडीयामुळे स्त्रीयांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बाेलता येत अाहे ही चांगली गाेष्ट अाहे. परंतु अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी का अावाज उठवला जाताेय, त्यावेळीच का बाेललं गेलंं नाही. अत्याचार झाला त्यावेळीच स्त्रीयांनी पुढे येऊन बाेलयाला हवं हाेतं. मी टू चळवळ जरी चांगली असली तरी या मी टू बाबत अनेक विनाेद अाणि मेमे येण्यास सुरुवात झाली अाहे. त्यामुळे कदाचित या चळवळीचे गांभिर्य कमी हाेऊ शकते. स्त्रीयांनी ज्याक्षणी त्यांच्यावर अत्याचार हाेईल त्याच क्षणी अावाज उठवायला हवा, असं ताे म्हणताे. 

    या चळवळीमुळे स्त्रीयांना एकत्र येत अापल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल अावाज उठवता येताेय, ही खूप चांगली गाेष्ट असल्याचे सिद्धेश म्हणताे, अापल्या देशातील सामाजिक परिस्थीती पाहता महिलांवर अत्याचार झाले तरी त्या अनेकदा पुढे येत नाही. त्यांना ज्या व्यक्तीने अत्याचार केले त्याचा एकंदर राजकीय, सामाजिक दबाव पाहता अावाज उठवता येत नाही. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून या महिला एकत्र येत अावाज उठवत अाहेत. अाराेपांबाबतची शहानिशा, कायदेशीर कारवाई हाेईलच परंतु महिला मनात न ठेवता पुढे येऊन बाेलत अाहे हे खूप महत्वाचे अाहे. कुठल्याही निर्णयापर्यंत येताना दाेन्ही बाजू मात्र तपासून पाहायला हव्यात. 

    अनुज म्हणताे, ही खूप चांगली चळवळ अाहे, अनेक महिला पुढे येऊन याबद्दल बाेलतायेत. परंतु या चळवळीचा काेणी गैरफायदा घेणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.  ही चळवळ अशीच चालू राहायला हवी. तर साईनाथ म्हणाला, एखाद्या स्त्रीची अनुमती नसताना चुकीची गाेष्ट घडत असेल तर त्याकडे गांभिर्याने पाहायला हवे. ते प्रकरण तिथेच न राहता त्याप्रकरणाची शहानिशा करुन याेग्य ती कारवाई करायला हवी. एखाद्याचे समाजातील स्थानावरुन ताे असे काही करणार नाही, असा अंदाज बांधने गैर ठरेल. परंतु महिलांनी केवळ अाराेप न करता त्या प्रकणाच्या शेवटपर्यंत जायला हवे. तसेच त्या व्यक्तीकडून त्याच्या चुकीची कबुली घेणे अावश्यक अाहे. इतक्या वर्षांनी महिला का बाेलत अाहेत, हा प्रश्न निरर्थक अाहे. अनेकदा महिलांना ज्यावेळी अत्याचार हाेताे, त्यावेळी अावाज उठवता येत नाही याचा अर्थ त्यांनी नंतर अावाज उठवू नये असा हाेत नाही. या चळवळीमुळे चलता है हा समज जाण्यास मदत हाेत अाहे. तसेच महिलांना त्यांचा अावाज उठविण्यासाठी एक व्यासपीठ मिळत अाहे. परंतु दुसरी बाजू जाणून घेणेही तितकेच महत्वाचे अाहे. 

टॅग्स :PuneपुणेMetoo Campaignमीटूcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी