शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:18 IST

मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. 

ठळक मुद्देकोकणात १५, मराठवाडा १६, विदर्भात ६ टक्के अधिक तर मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस

पुणे: कोकणात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मुंबई उपनगरात सर्वाधिक ६० टक्के पाऊस जास्त झाला आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वात  ३८ टक्के कमी पाऊस पडला  आहे़. कोकणात सर्व जिल्ह्यात मिळून १५ टक्के अधिक पाऊस झाला असून मराठवाड्यात १६ टक्के, विदर्भात ६ टक्के अधिक पाऊस झाला  आहे़. मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील १० जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे़. भारतीय हवामान विभागामार्फत जिल्ह्यात नोंदविण्यात आलेल्या पावसावरुन एकूण जिल्ह्यात किती पाऊस पडला, याची सरासरी काढली जाते़. त्यावरुन जिल्ह्याचा पाऊस निश्चित केला जातो़ . १ जूनपासून ४ जुलैपर्यंत कोकण, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर -१३, नंदूरबार २८, नाशिक ११, सांगली -२१, सातारा -३ या पाच जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़. कोकणातील सर्व ७ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांपैकी ५ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील अनेक भागात असमान पाऊस असतो़ काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो़. पण, राज्यात सर्वत्र पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला जातो़. त्यावरुन जिल्ह्याची सरासरी काढली जाते़ त्यावरुन जिल्ह्यात साधारण किती पाऊस झाला याचा अंदाज येत असतो़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र