शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:18 IST

मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. 

ठळक मुद्देकोकणात १५, मराठवाडा १६, विदर्भात ६ टक्के अधिक तर मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस

पुणे: कोकणात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मुंबई उपनगरात सर्वाधिक ६० टक्के पाऊस जास्त झाला आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वात  ३८ टक्के कमी पाऊस पडला  आहे़. कोकणात सर्व जिल्ह्यात मिळून १५ टक्के अधिक पाऊस झाला असून मराठवाड्यात १६ टक्के, विदर्भात ६ टक्के अधिक पाऊस झाला  आहे़. मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील १० जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे़. भारतीय हवामान विभागामार्फत जिल्ह्यात नोंदविण्यात आलेल्या पावसावरुन एकूण जिल्ह्यात किती पाऊस पडला, याची सरासरी काढली जाते़. त्यावरुन जिल्ह्याचा पाऊस निश्चित केला जातो़ . १ जूनपासून ४ जुलैपर्यंत कोकण, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर -१३, नंदूरबार २८, नाशिक ११, सांगली -२१, सातारा -३ या पाच जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़. कोकणातील सर्व ७ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांपैकी ५ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील अनेक भागात असमान पाऊस असतो़ काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो़. पण, राज्यात सर्वत्र पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला जातो़. त्यावरुन जिल्ह्याची सरासरी काढली जाते़ त्यावरुन जिल्ह्यात साधारण किती पाऊस झाला याचा अंदाज येत असतो़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र