शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 17:47 IST

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न होत असताना सामूहिक कॉपीच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ

यवत :  केडगाव (ता. दौंड) येथे बारावी बोर्डाचे परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी करण्यास विद्यार्थ्यांना मदत केल्याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर मोठी काळजी घेतली जात आहे. अशातच केडगाव येथे सामूहिक कॉपी प्रकरणात परीक्षण केंद्रप्रमुख यांच्यासह नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.              पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालय असणाऱ्या परीक्षा केंद्रात भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाचे प्रमुख व  विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.

सोमवार (दि.२७) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील जवाहर विद्यालयातील बारावीची परीक्षा केंद्र क्रमांक १९३ येथे अचानक भेट दिली. तेव्हा परीक्षा काॅपीमुक्त न करता, विद्यार्थ्यांना सामूहिक काॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता,  त्यांना काॅपी करण्यासाठी उत्तेजन देऊन अप्रत्यक्ष सहाय्य केले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन १९८२ ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली.

आरोपी परीक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उपकेंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, शिक्षक  प्रकाश कुचेकर,  विकास दिवेकर, शाम गोरगल, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोडनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करीत आहेत.

कॉपी पकडल्यास पुढच्या पेपरवर प्रतिबंध 

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परीक्षेदरम्यान केंद्रांवर भरारी पथकाद्वारे पाहणी केली जात आहे. विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जात आहे. एकदा कारवाई केल्यावर विद्यार्थ्यांना पुढचे कुठलेही पेपर देता येत नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा वापर करू नये असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक