शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

मराठीचे झाले आता थोडे महापालिका निवडणुकीचे पाहू; शिव-मन सैनिकांची भावना, युतीबाबत अनिश्चितताच

By राजू इनामदार | Updated: June 30, 2025 17:12 IST

एकत्र येत मराठी भाषेचा लढा यशस्वीपणे लढला, आता महापालिका निवडणुका जिंकायच्या तर असेच एकत्र रहायला हवे, शिव-मन सैनिकांची भावना

पुणे : ‘एकत्र येत मराठी भाषेचा लढा यशस्वीपणे लढला, आता महापालिका निवडणुका जिंकायच्या तर असेच एकत्र रहायला हवे’ अशीच बहुसंख्य शिवसैनिक (उद्धव ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांची भावना आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी याबाबत अद्याप काहीही भाष्य केले नसल्याने राज्यातील महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती होईल किंवा नाही याबाबत अजून अनिश्चितताच आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रांतर्गत लागू केलेली हिंदी भाषेची सक्ती मराठी भाषेच्या मुळावर येत असल्याची तक्रार करत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवला. त्याला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची साथ मिळावी. ५ जुलैचा मोर्चा जाहीर झाला, त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवणार असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय कलाकार, साहित्य संस्था, संघटना यांनीही मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. सरकारमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मत व्यक्त केले.

हा रोष लक्षात घेत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने यासंबंधी जारी केलेले दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याचे जाहीर केले. मनसेशिवसेना यांच्या एकत्रिकरणामुळेच हा निर्णय सरकारला घ्यावा लागला असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता महापालिका निवडणुकांसाठीही अशीच युती व्हावी असे त्यांना वाटते. स्वतंत्र लढून शक्ती वाया घालवण्यापेक्षा समान मुद्द्यावर एकत्र लढलो तर यश मिळेल अशी खात्री दोन्हीकडच्या अनेकांना वाटते आहे.

राज्यातील २९ महापालिकांमध्ये निवडणूक आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यांच्याही निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बराच रस असतो. त्यातही मनसेकडून मागील काही वर्षात अशी स्थानिक राजकीय चाचपणीच झालेली नाही. त्यामुळे त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात निवडणुकीसाठी बराच उत्साह आहे. शिवसेनेलाही फुटीनंतर आपले राजकीय अस्तित्व दाखवून द्यायचे आहे.

मनसेमध्ये राज ठाकरे व शिवसेनेत उद्धव ठाकरे हेच सर्वेसर्वा आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर त्यांनी यावर अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. अध्यादेश मागे घेतले गेल्यानंतर ५ जुलैला मुंबईत काढणारा मोर्चा रद्द करून मुंबईतच विजयी मेळावा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले असले तरी त्याचा तपशील अद्याप सांगितला गेलेला नाही. हा मेळावा मोर्चाप्रमाणेच राजकीय पक्षमुक्त असणार आहे. त्यामुळे मेळावा झाला तरीही महापालिका निवडणुकीसाठी वेगळा, स्वतंत्र राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे. तो कधी होणार याची प्रतिक्षा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे.

मनसेबरोबर राहून समान जागांवर लढता येईल

सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याबरोबर आहे. मनसेला बरोबर घेण्याला त्यांचा नकार असू शकतो, मात्र मविआत राहून जागांचा कमीपणा घेण्यापेक्षा मनसेबरोबर राहून समान जागांवर लढता येईल असाही विचार काही पदाधिकारी करत आहेत.

मनसेमधील राजकीय निर्णय राज ठाकरे स्वत: घेत असतात. हिंदी सक्तीला विरोध हे वेगळा विषय व महापालिका निवडणुकांसाठी युती हा वेगळा विषय आहे. यासंबधीच ते स्वत: काही जाहीर करतील, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल.- बाबू वागसकर, संपर्क नेते

हिंदी सक्तीविरोधात राज्यातील समस्त मराठी माणूस उभा राहिला. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र यासाठीच शिवसेनेचा जन्म आहे. आमचे नेते उद्धव ठाकरे यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील याचा आम्हाला विश्वास आहे.- संजय मोरे, शिवसेना, शहरप्रमुख

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाMNSमनसेPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र