शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खासदार संभाजीराजेंना सांगितला मराठा आरक्षणासाठीचा 'हा' कायदेशीर मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:46 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यात ताजेपणा येईल : प्रकाश आंबेडकर 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतीमार्फत पुनर्विचार याचिका हा सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे मत वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे, खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल, असेही त्यांनी सांगितले. 

खासदार संभाजी महाराज यांनी आज अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील घरी भेट घेऊन मराठा आरक्षणाबरोबरच विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. संभाजी महाराज यांनी सांगितले की, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का?. शाहु महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल. समतेचा हा विचार पुढे नेण्यासाठी काय करता, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी २ ते ३ मार्ग आम्हाला सांगितले.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले की, आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे अ‍ॅडमिनिस्टेशन प्रिन्सिपल होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत. मराठा आरक्षणचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राज्यसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावर ससंदेत सांगितले की, आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पूवर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते. 

शरद पवारांनी नरो वा कुंरोवा भूमिका सोडावी...अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांचे राजकारण ४० वर्षे पाहतोय. ते नेहमी नरो वा कुंरोवा भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीक काळात स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा करुया.

संभाजी राजे यांनी सांगितले की, गायकवाड अहवालातील त्रुटी भरुन काढाव्या लागतील. त्यासाठी काही दिवस लागतील. मराठा आरक्षण हा प्रश्न व्यापक करण्यासाठी लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शरद पवारांसह प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावणार आहे. 

......लोकांना वेठीस धरु नयेविनायक मेटे हे ५ जून रोजी आंदोलन करणार आहे, त्याविषयी संभाजी राजे यांनी सांगितले की, हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. त्यातून मार्ग काढण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे. तेव्हा लोकांना वेठीस धरु नये. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मार्ग आहेत. 

मराठा आरक्षण मुद्दा त्रासदायकमराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना त्रासदायक ठरणार आहे. येणार्‍या सरकारला काही वेळा राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल, असा इशारा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती