शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:46 IST

अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत

ओतूर : जुन्नर तालुक्यातील पूर्व, पश्चिम, उत्तरेकडील बहुतांशी आदिवासी भागात एप्रिलमध्येच पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली असून, अगदी हंडाभर पाणी मिळविण्यासाठी खोल दरीत शिवकालीन टाक्यात व विहिरीत उतरून आदिवासी महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आपला जीव धोक्यात घालताना दिसून येत आहेत. दरवर्षीप्रमाणे कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे व मांडवी नदीच्या खोऱ्यातील वाड्यावस्त्या, झापावरील गेली ७० वर्षांपासून रखडलेला आणि फक्त उन्हाळ्यात राजकीय नेत्यांना आठवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदादेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने जुन्नरच्या पूर्व-पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे.

स्थळ पाहणीकरून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे मांडवे, कोटमवाडी, सुकळवेढे या तीन ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. सहा टँकर मागणी प्रस्ताव मंजूर असून, त्या भागांत टँकरने पाणीपुरवठा एकाच टँकरने सुरू आहे, तोही मनाप्रमाणे पाणीपुरवठा करताना दिसत आहे. बाकीचे टँकर पाणीपुरवठा फक्त कागदोपत्री दिसत आहे. आदिवासी भागातील हडसर ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता कारभळ, पूर्व भागातील नळावणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांची भेट घेऊन टँकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबत सरपंच कारभळ म्हणाल्या, "जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मागील अडीच वर्षांपूर्वी सुरू केले आहे. हे काम अद्याप अपूर्ण आहे. हडसर येथील तलाव कोरडा पडला आहे. तलावातील गाळ काढणे आवश्यक आहे. गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधला आहे. या भागातील हडसर, पेठेची वाडी येथे पाण्याची तीव्र टंचाई असल्याने तातडीने टँकर सुरू करणे आवश्यक आहे. पाण्यावाचून जनावरांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहेत." सरपंच उबाळे म्हणाल्या, "शिंदेवाडी, पेमदरा, आणे भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागात टँकर सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी भोईर यांना प्रस्ताव दिला आहे.

नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार 

कोपरे, मांडवे व जांभूळशीसह वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू झाले. मात्र, टँकर चालक ओळखीच्या ठिकाणी पाण्याची लूट करताना दिसून येत आहेत. गावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर जल, हर घर नल’ योजनेंतर्गत पाण्यासाठी पाइपलाइन टाकलेल्या आहेत; परंतु आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी काहीशी गत जुन्नर तालुक्यातील अतिदुर्ग आदिवासी भागातील गावांची झाली आहे. अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत. प्रशासनाकडून पाण्याच्या योजना राबविण्याचा कागदोपत्री केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

जुन्नर तालुक्यातील तेरा गाव व वाड्या वस्तीतील एकूण ७१६१ लोकसंख्येला टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये मांडवे ८३५, कोपरे १०६५, सुकाळवेढे ४९६, आंबे ६२०, निमगिरी १५४०, कोटमवाडी ३५०, बांगरवाडी १४१०, हडसर ११८८, गोद्रे १०५५, शिंदेवाडी २१३०, आणे ३५००, खटकाळे खैरे २५० व देवळे ७५० या १३ गावातील वाड्या वस्त्यातील नागरिकांना पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्यात आले आहेत. या भागामध्ये टँकरची संख्या वाढली पाहिजे, अशी नागरिकांकडून सातत्याने ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येत आहे. आम्ही त्यावर टँकर संख्या वाढ करून देत आहोत; पण लोकसंख्येनुसार हंड्याऐवजी बॅरलने पाणी नागरिकांनी घ्यावे. - विठ्ठल भोईर, गटविकास अधिकारी, जुन्नर

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरWaterपाणीTemperatureतापमानDamधरणweatherहवामान अंदाजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार