शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके

By श्रीकिशन काळे | Updated: October 5, 2024 16:57 IST

मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

पुणे: आज पत्रलेखन करणं अत्यंत दुर्मिळ झाले आहे. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पत्रलेखन करता येत नाही. नीट लिहिता येत नाही. पत्रलेखन पुन्हा करता यावे म्हणून टपाल विभागाने खास ‘ढाई आखर’ नावाने पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सर्वांना पत्रलेखन करता येणार असून, त्यासाठी हजारो रूपयांची पारितोषिक ठेवली आहेत.

भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर ‘ढाई आखर’ या शीर्षकाखाली ‘लेखनाचा आनंद-डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह इतर कोणत्याही बोलीभाषेत पत्र लिहिता येणार आहे. यासाठी अठरा वर्षांपर्यंत आणि खुला गट असे दोन विभाग आहेत. स्पर्धेसाठी लागणारे अंतर्देशीय पत्रे आणि लिफाफे स्पर्धकांना जवळील टपाल कार्यालयात मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. विजेत्यांना राज्य पातळीवर अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजार, तर केंद्रीय पातळीवर ५० हजार, २५ हजार आणि १० हजार अशी पारितोषिके ठेवली आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण विभागाचे अधिक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.

नागरिकांनी पत्र लिहून सर्व पत्रे हे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई : ४०००१ या पत्त्यावर पाठवायची आहेत. अधिक माहितीसाठी टपाल कार्यालय किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एरंडे यांनी केले.

नागरिक पुन्हा पत्रलेखनाकडे वळावेत, यासाठी टपाल विभागाने ही स्पर्धा आयोजित केली. मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ही स्पर्धा आहे. यातून अनेकांना जुना पत्रलेखनाचा काळ आठवले. त्यांच्या आठवणी जाग्या होतील. पत्रलेखनाची परंपरा पुन्हा सुरू होईल.- बी. पी. एरंडे, अधिक्षक, पुणे ग्रामीण टपाल विभाग

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक