शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके

By श्रीकिशन काळे | Updated: October 5, 2024 16:57 IST

मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

पुणे: आज पत्रलेखन करणं अत्यंत दुर्मिळ झाले आहे. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पत्रलेखन करता येत नाही. नीट लिहिता येत नाही. पत्रलेखन पुन्हा करता यावे म्हणून टपाल विभागाने खास ‘ढाई आखर’ नावाने पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सर्वांना पत्रलेखन करता येणार असून, त्यासाठी हजारो रूपयांची पारितोषिक ठेवली आहेत.

भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर ‘ढाई आखर’ या शीर्षकाखाली ‘लेखनाचा आनंद-डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह इतर कोणत्याही बोलीभाषेत पत्र लिहिता येणार आहे. यासाठी अठरा वर्षांपर्यंत आणि खुला गट असे दोन विभाग आहेत. स्पर्धेसाठी लागणारे अंतर्देशीय पत्रे आणि लिफाफे स्पर्धकांना जवळील टपाल कार्यालयात मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. विजेत्यांना राज्य पातळीवर अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजार, तर केंद्रीय पातळीवर ५० हजार, २५ हजार आणि १० हजार अशी पारितोषिके ठेवली आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण विभागाचे अधिक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.

नागरिकांनी पत्र लिहून सर्व पत्रे हे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई : ४०००१ या पत्त्यावर पाठवायची आहेत. अधिक माहितीसाठी टपाल कार्यालय किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एरंडे यांनी केले.

नागरिक पुन्हा पत्रलेखनाकडे वळावेत, यासाठी टपाल विभागाने ही स्पर्धा आयोजित केली. मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ही स्पर्धा आहे. यातून अनेकांना जुना पत्रलेखनाचा काळ आठवले. त्यांच्या आठवणी जाग्या होतील. पत्रलेखनाची परंपरा पुन्हा सुरू होईल.- बी. पी. एरंडे, अधिक्षक, पुणे ग्रामीण टपाल विभाग

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक