शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:00 IST

अतिशय संघर्षाच्या काळात करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते

पुणे : ‘ना मी प्रशिक्षित अभिनेत्री ना माझा कुणी गॉडफादर. रस्ता मिळत गेला तसे यशही मिळत गेले. पण, माझा अभिनय प्रवास तितकासा काही सुखकर नव्हता. पहिल्यांदा चित्रपटासाठी ऑडिशन देताना 'चक्रम' या मल्याळम् सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण काही कारणाने तो चित्रपट रद्द झाला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात तब्बल बारा मल्याळम् चित्रपट केले. त्यातले तर तीन प्रसिद्धच झाले नाहीत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत माझ्यावर ‘पनौती’चा शिक्का बसला. अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी बोलून दाखविली.

चित्रपटांमध्ये एरवी ‘बोल्ड’ भूमिका करणारी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मात्र काळ्या रंगाची कॉटनची साडी, ना दागिने, ना मेकअप अशा साध्या वेशभूषेत आली होती. पण विचारांच्या ‘बोल्डनेस’ने तिने सर्वांचीच मने जिंकली. आपल्या अभिनयाचा प्रवास तिने मनमोकळेपणाने मांडला. त्या पुढे म्हणाल्या, एका चित्रपटामध्ये भूमिका करताना मला काढून टाकतील अशी भीती वाटली होती. तेव्हा आईने मला एका ज्योतिषाकडे नेले. माझा हात पाहिल्यानंतर ज्योतिषी म्हणाले की ‘कोण म्हटलं, तुला काढून टाकतील आणि दुसऱ्याच दिवशी मला काढून टाकल्याचा फोन आला. त्यानंतर मी ज्योतिषांना जवळपास पिटाळूनच लावते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी नैराश्यामुळे रात्रीच्या वेळी चेंबूरच्या साईबाबा मंदिरातही जायचे आणि तेथे बाबांशी जोरजोरात बोलून मन मोकळे करायचे. तेव्हा रात्रीच्या वेळी इथे एक मुलगी येते आणि जोरजोरात बोलते असे पसरले होते हे देखील त्या हसून सांगत होत्या. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडीओने चित्र बदलले. त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.

महिलाकेंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशा वेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हाच त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिलाकेंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे माझ्यासाठी आजच्या काळात एक आव्हान असल्याचे त्या म्हणाल्या. ‘मी स्वत: कल्पना करू शकणार नाही. अशा भूमिका मला मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मी कायम अशा भूमिकांची भुकेलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

ते आमचे काम नाही

राजकीय परिस्थितीवर कलाकारांनी का बोलावे? ते आमचे काम नाही. एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? कलाकारांचे काम हे मनोरंजन करण्याचे आहे. राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे, असे परखड मत विद्या बालन यांनी व्यक्त केले.

काय गं कशी आहेस?

विद्या बालन थिएटरमध्ये जात असताना मध्येच त्यांची चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशी ओळख असलेल्या अरुणा राजे दिसल्या. अरुणा यांना पाहताच विद्या बालन म्हणाल्या, काय गं कशी आहेस? त्यांचे शुद्ध मराठी ऐकून सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाVidya Balanविद्या बालनSocialसामाजिक