शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:00 IST

अतिशय संघर्षाच्या काळात करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते

पुणे : ‘ना मी प्रशिक्षित अभिनेत्री ना माझा कुणी गॉडफादर. रस्ता मिळत गेला तसे यशही मिळत गेले. पण, माझा अभिनय प्रवास तितकासा काही सुखकर नव्हता. पहिल्यांदा चित्रपटासाठी ऑडिशन देताना 'चक्रम' या मल्याळम् सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण काही कारणाने तो चित्रपट रद्द झाला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात तब्बल बारा मल्याळम् चित्रपट केले. त्यातले तर तीन प्रसिद्धच झाले नाहीत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत माझ्यावर ‘पनौती’चा शिक्का बसला. अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी बोलून दाखविली.

चित्रपटांमध्ये एरवी ‘बोल्ड’ भूमिका करणारी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मात्र काळ्या रंगाची कॉटनची साडी, ना दागिने, ना मेकअप अशा साध्या वेशभूषेत आली होती. पण विचारांच्या ‘बोल्डनेस’ने तिने सर्वांचीच मने जिंकली. आपल्या अभिनयाचा प्रवास तिने मनमोकळेपणाने मांडला. त्या पुढे म्हणाल्या, एका चित्रपटामध्ये भूमिका करताना मला काढून टाकतील अशी भीती वाटली होती. तेव्हा आईने मला एका ज्योतिषाकडे नेले. माझा हात पाहिल्यानंतर ज्योतिषी म्हणाले की ‘कोण म्हटलं, तुला काढून टाकतील आणि दुसऱ्याच दिवशी मला काढून टाकल्याचा फोन आला. त्यानंतर मी ज्योतिषांना जवळपास पिटाळूनच लावते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी नैराश्यामुळे रात्रीच्या वेळी चेंबूरच्या साईबाबा मंदिरातही जायचे आणि तेथे बाबांशी जोरजोरात बोलून मन मोकळे करायचे. तेव्हा रात्रीच्या वेळी इथे एक मुलगी येते आणि जोरजोरात बोलते असे पसरले होते हे देखील त्या हसून सांगत होत्या. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडीओने चित्र बदलले. त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.

महिलाकेंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशा वेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हाच त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिलाकेंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे माझ्यासाठी आजच्या काळात एक आव्हान असल्याचे त्या म्हणाल्या. ‘मी स्वत: कल्पना करू शकणार नाही. अशा भूमिका मला मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मी कायम अशा भूमिकांची भुकेलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

ते आमचे काम नाही

राजकीय परिस्थितीवर कलाकारांनी का बोलावे? ते आमचे काम नाही. एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? कलाकारांचे काम हे मनोरंजन करण्याचे आहे. राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे, असे परखड मत विद्या बालन यांनी व्यक्त केले.

काय गं कशी आहेस?

विद्या बालन थिएटरमध्ये जात असताना मध्येच त्यांची चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशी ओळख असलेल्या अरुणा राजे दिसल्या. अरुणा यांना पाहताच विद्या बालन म्हणाल्या, काय गं कशी आहेस? त्यांचे शुद्ध मराठी ऐकून सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाVidya Balanविद्या बालनSocialसामाजिक