शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:00 IST

अतिशय संघर्षाच्या काळात करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते

पुणे : ‘ना मी प्रशिक्षित अभिनेत्री ना माझा कुणी गॉडफादर. रस्ता मिळत गेला तसे यशही मिळत गेले. पण, माझा अभिनय प्रवास तितकासा काही सुखकर नव्हता. पहिल्यांदा चित्रपटासाठी ऑडिशन देताना 'चक्रम' या मल्याळम् सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण काही कारणाने तो चित्रपट रद्द झाला. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात तब्बल बारा मल्याळम् चित्रपट केले. त्यातले तर तीन प्रसिद्धच झाले नाहीत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत माझ्यावर ‘पनौती’चा शिक्का बसला. अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी बोलून दाखविली.

चित्रपटांमध्ये एरवी ‘बोल्ड’ भूमिका करणारी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मात्र काळ्या रंगाची कॉटनची साडी, ना दागिने, ना मेकअप अशा साध्या वेशभूषेत आली होती. पण विचारांच्या ‘बोल्डनेस’ने तिने सर्वांचीच मने जिंकली. आपल्या अभिनयाचा प्रवास तिने मनमोकळेपणाने मांडला. त्या पुढे म्हणाल्या, एका चित्रपटामध्ये भूमिका करताना मला काढून टाकतील अशी भीती वाटली होती. तेव्हा आईने मला एका ज्योतिषाकडे नेले. माझा हात पाहिल्यानंतर ज्योतिषी म्हणाले की ‘कोण म्हटलं, तुला काढून टाकतील आणि दुसऱ्याच दिवशी मला काढून टाकल्याचा फोन आला. त्यानंतर मी ज्योतिषांना जवळपास पिटाळूनच लावते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी नैराश्यामुळे रात्रीच्या वेळी चेंबूरच्या साईबाबा मंदिरातही जायचे आणि तेथे बाबांशी जोरजोरात बोलून मन मोकळे करायचे. तेव्हा रात्रीच्या वेळी इथे एक मुलगी येते आणि जोरजोरात बोलते असे पसरले होते हे देखील त्या हसून सांगत होत्या. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडीओने चित्र बदलले. त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या.

महिलाकेंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशा वेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हाच त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिलाकेंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे माझ्यासाठी आजच्या काळात एक आव्हान असल्याचे त्या म्हणाल्या. ‘मी स्वत: कल्पना करू शकणार नाही. अशा भूमिका मला मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मी कायम अशा भूमिकांची भुकेलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

ते आमचे काम नाही

राजकीय परिस्थितीवर कलाकारांनी का बोलावे? ते आमचे काम नाही. एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? कलाकारांचे काम हे मनोरंजन करण्याचे आहे. राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे, असे परखड मत विद्या बालन यांनी व्यक्त केले.

काय गं कशी आहेस?

विद्या बालन थिएटरमध्ये जात असताना मध्येच त्यांची चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशी ओळख असलेल्या अरुणा राजे दिसल्या. अरुणा यांना पाहताच विद्या बालन म्हणाल्या, काय गं कशी आहेस? त्यांचे शुद्ध मराठी ऐकून सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाVidya Balanविद्या बालनSocialसामाजिक