शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 17:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक

ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे आधी केले असते तर कमी किंमतीत लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकले आहे. राज्यांपासून शहरांपर्यंत वेगवेगळ्या ऑर्डर दिल्या जात आहेत. लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, रोहित टिळक, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र शनगेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते. 

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेली बालाकोट येथील कारवाईमधील शहिदांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, समता बंधुता ऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष पोसला आहे. लोकशाहीचे दमन केले असून कोरोना काळात नियोजनशून्य कारभार, अहंकार आणि आत्ममग्नता यामुळे देशाची अवस्था वाईट झाली आहे. कलम ३७० पारित करून घेतल्यानंतर दंडुकेशाहीच्या जोरावर काश्मीरमधील उठाव दडपला. नेत्यांना तुरुंगात डांबले. घटनेने दिलेला भाषण व विचार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दडपला गेला. धर्मावर आधारित राजकारण करीत नागरिकत्वाचा कायदा रेटून पारित करण्यात आला.  हिंदुत्वाचा अजेंडा असलेल्या या कायद्याविरुद्ध देशभरात झालेली आंदोलने चिरडल्याचे चव्हाण म्हणाले. 

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली 

नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटीची ढिसाळ अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहिमध्ये आर्थिक विकास दर हा नीचांकी ४.२ टक्के होता. कोरोना काळात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर उणे २४ टक्क्यापर्यंत घसरला. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग ही मोदींची चूक 

आत्मनिर्भरतेचा नारा दिलेल्या सरकारने वास्तवात सरकारी कंपन्या, विमानतळ, बंदरे, रेल्वेचे काही भाग मातीमोल भावाने विकून कर्ज भागविले. स्पेस टेक्नॉलॉजीसारख्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या यंत्रणेच्या खासगीकरण घाट घातला. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असून खर्च वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल पेट्रोल दर वाढविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दर वाढविले जात असून जनतेला खोटे सांगितले जाते. या सरकारला परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणावर अपयश आले आहे. चीनसोबतचे संबंध बिघडले असून नेपाळ, श्रीलंका हे देशही चीनच्या जवळ गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग घेऊन मोदींनी चूक केल्याचे चव्हाण म्हणाले. सत्तेत आलेल्या भाजपाने दुर्लक्ष केल्याने दुखावलेले शिवसेना, अकाली दल असे पक्ष त्याच्यापासून दुरावले. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन या काळ्या कायद्यांमुळे उध्वस्त झाले. मोठ्या उद्योपतींचा फायदा पहिला गेला. असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसMLAआमदारCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत