शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 17:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक

ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे आधी केले असते तर कमी किंमतीत लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकले आहे. राज्यांपासून शहरांपर्यंत वेगवेगळ्या ऑर्डर दिल्या जात आहेत. लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, रोहित टिळक, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र शनगेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते. 

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेली बालाकोट येथील कारवाईमधील शहिदांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, समता बंधुता ऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष पोसला आहे. लोकशाहीचे दमन केले असून कोरोना काळात नियोजनशून्य कारभार, अहंकार आणि आत्ममग्नता यामुळे देशाची अवस्था वाईट झाली आहे. कलम ३७० पारित करून घेतल्यानंतर दंडुकेशाहीच्या जोरावर काश्मीरमधील उठाव दडपला. नेत्यांना तुरुंगात डांबले. घटनेने दिलेला भाषण व विचार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दडपला गेला. धर्मावर आधारित राजकारण करीत नागरिकत्वाचा कायदा रेटून पारित करण्यात आला.  हिंदुत्वाचा अजेंडा असलेल्या या कायद्याविरुद्ध देशभरात झालेली आंदोलने चिरडल्याचे चव्हाण म्हणाले. 

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली 

नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटीची ढिसाळ अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहिमध्ये आर्थिक विकास दर हा नीचांकी ४.२ टक्के होता. कोरोना काळात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर उणे २४ टक्क्यापर्यंत घसरला. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशच्याही खाली गेले. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग ही मोदींची चूक 

आत्मनिर्भरतेचा नारा दिलेल्या सरकारने वास्तवात सरकारी कंपन्या, विमानतळ, बंदरे, रेल्वेचे काही भाग मातीमोल भावाने विकून कर्ज भागविले. स्पेस टेक्नॉलॉजीसारख्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या यंत्रणेच्या खासगीकरण घाट घातला. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असून खर्च वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल पेट्रोल दर वाढविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दर वाढविले जात असून जनतेला खोटे सांगितले जाते. या सरकारला परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणावर अपयश आले आहे. चीनसोबतचे संबंध बिघडले असून नेपाळ, श्रीलंका हे देशही चीनच्या जवळ गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग घेऊन मोदींनी चूक केल्याचे चव्हाण म्हणाले. सत्तेत आलेल्या भाजपाने दुर्लक्ष केल्याने दुखावलेले शिवसेना, अकाली दल असे पक्ष त्याच्यापासून दुरावले. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन या काळ्या कायद्यांमुळे उध्वस्त झाले. मोठ्या उद्योपतींचा फायदा पहिला गेला. असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसMLAआमदारCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत