शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:37 IST

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली

पाटस (ता. दौंड) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आत केंद्रातील भाजपचे सरकार घरी जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. पाटस (ता. दौंड) येथे शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली, असे अजित पवार(Ajit Pawar) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येणार, यात शंका नाही. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एक महिन्यात अन्य पक्षांचा पाठिंबा घेतलेले केंद्रातील भाजप सरकार घरी गेलेले असेल. आमची लढाई भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. ही लढाई मराठी माणसांच्या जोरावर जिंकल्याशिवाय राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची माफी मागावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडे चार खासदार राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आठ खासदार झाले. ही शरद पवारांच्या पाठीशी असलेली मराठी माणसांची ताकद आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सर्व छोट्या-मोठ्या संस्था आमच्याकडे नव्हत्या. मात्र, आमच्याकडे मतदार राजा होता. दरम्यान, मतदारांनी त्यांची श्रद्धा आमच्यावर दाखविल्याने आमच्या खासदारांची संख्या वाढली. 

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभा