शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:37 IST

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली

पाटस (ता. दौंड) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आत केंद्रातील भाजपचे सरकार घरी जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. पाटस (ता. दौंड) येथे शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली, असे अजित पवार(Ajit Pawar) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येणार, यात शंका नाही. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एक महिन्यात अन्य पक्षांचा पाठिंबा घेतलेले केंद्रातील भाजप सरकार घरी गेलेले असेल. आमची लढाई भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. ही लढाई मराठी माणसांच्या जोरावर जिंकल्याशिवाय राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची माफी मागावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडे चार खासदार राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आठ खासदार झाले. ही शरद पवारांच्या पाठीशी असलेली मराठी माणसांची ताकद आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सर्व छोट्या-मोठ्या संस्था आमच्याकडे नव्हत्या. मात्र, आमच्याकडे मतदार राजा होता. दरम्यान, मतदारांनी त्यांची श्रद्धा आमच्यावर दाखविल्याने आमच्या खासदारांची संख्या वाढली. 

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभा