शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Harshvardhan Patil: हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार; शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून दिला जातोय त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:28 IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे.

बारामती : शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववतपणे चालू करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. तर वीज बिल माफ करावे अशी मागणी करणारेच सध्या सत्तेवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीचा विचार करून वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी असेही ते म्हणाले आहेत. 

''महावितरणने सध्या शेतीपंपांचा वीज पुरवठा वीज थकबाकी वसुलीसाठी खंडित केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रब्बी पिकांची पेरणी तसेच ऊस पिकाच्या लागवडीस चालू आहेत. सध्या महावितरणकडून जनावरांना व माणसांना पिण्याच्या पिण्यासाठी दररोज वीजपुरवठा तासभर देखील चालू ठेवला जात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुधनही अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे योग्य नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.''

''हर्षवर्धन पाटील यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन शेतीपंपांचा वीजपुरवठा चालु करण्यात यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याने वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली.'' 

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmahavitaranमहावितरणUddhav Thackerayउद्धव ठाकरे