शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:08 IST

महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं, आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे

पुणे: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष, चिन्ह अजित पवार यांच्या गटाला गेले. शरद पवार यांच्या गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्यात आले. तरीही शरद पवार गटाने लोकसभेला यश मिळवले. त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्याने दाखवून दिलं की, अदृश्य शक्ती इथं चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक वर्षांपूर्वी आमचा पक्ष कुठे होता,चिन्ह कुठे होतं,आमदार खासदार जे जी सत्तेची पद होती. त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन त्यांनी आमचं आयुष्य उध्वस्त केले. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते असं त्यांना नेहमी वाटत. पण आपल्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की, अदृश्य शक्तीच इथं काही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. 

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत येईल असे विरोधकांचे मत आहे. हा निर्णय वित्त मंत्रालयाच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. आता त्यांनी हा निर्णय रेटला असल्याचे वक्तव्य केलं आहे. सुळे म्हणाल्या,  डेटा फार महत्वाचा आहे, जो महारष्ट्र सरकारकडून येतो तुम्ही किती लोन घेऊ शकतात. केंद्र किंवा राज्याला काही लिमिट अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घातले होते. एफ आर बी एम कायदा कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज यावर बोलले होते. गडकरी, राज ठाकरे हे तेच म्हणतं आहे. अभ्यासाची तसेच म्हणतात त्यामुळे डेटा सगळं सांगतो. निर्णय रेटला आहे, ऑब्जेक्शन असताना. लोकशाही मध्ये सगळयांना बोलण्याचा अधिकार आहे.

वर्दीचा धाक देशात राहिला नाही

बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती