शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:08 IST

महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं, आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे

पुणे: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष, चिन्ह अजित पवार यांच्या गटाला गेले. शरद पवार यांच्या गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्यात आले. तरीही शरद पवार गटाने लोकसभेला यश मिळवले. त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्याने दाखवून दिलं की, अदृश्य शक्ती इथं चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक वर्षांपूर्वी आमचा पक्ष कुठे होता,चिन्ह कुठे होतं,आमदार खासदार जे जी सत्तेची पद होती. त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन त्यांनी आमचं आयुष्य उध्वस्त केले. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते असं त्यांना नेहमी वाटत. पण आपल्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की, अदृश्य शक्तीच इथं काही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. 

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत येईल असे विरोधकांचे मत आहे. हा निर्णय वित्त मंत्रालयाच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. आता त्यांनी हा निर्णय रेटला असल्याचे वक्तव्य केलं आहे. सुळे म्हणाल्या,  डेटा फार महत्वाचा आहे, जो महारष्ट्र सरकारकडून येतो तुम्ही किती लोन घेऊ शकतात. केंद्र किंवा राज्याला काही लिमिट अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घातले होते. एफ आर बी एम कायदा कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज यावर बोलले होते. गडकरी, राज ठाकरे हे तेच म्हणतं आहे. अभ्यासाची तसेच म्हणतात त्यामुळे डेटा सगळं सांगतो. निर्णय रेटला आहे, ऑब्जेक्शन असताना. लोकशाही मध्ये सगळयांना बोलण्याचा अधिकार आहे.

वर्दीचा धाक देशात राहिला नाही

बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती