शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:19 IST

सरकार स्थापन होईना : नव्याने निवडणुकीची बसली धास्ती

ठळक मुद्देजरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच

पुणे : आधी उमेदवार मिळविण्याची लढाई, त्यानंतर निवडून येण्यासाठीची धडपड व आता निवडून आल्यानंतर, तब्बल १८ दिवस झाले, तरी साधी शपथही घ्यायची संधी मिळाली नसल्याने नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा विरस झाला आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट म्हणजे पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे की काय, याची धास्ती त्यातील काठांवर निवडून आलेल्यांना बसली आहे.मुंबईत सध्या सुरू असलेले राजकारण या नव्याने निवडून आलेल्या आमदारांना कळेनासे झाले आहे. विजयाचा गुलाल अंगावर असतानाच आमदारकीची शपथ थेट विधानसभेत घेण्यातील नवेपण त्यांना अनुभवायचे होते. त्यालाच धक्का बसल्याने त्यांच्यातील बरेचजण वैतागले आहेत. त्यातच पक्ष मतदारसंघात जाऊ द्यायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच केली आहे. कोणाचे आमदार जयपूरला, तर कोणाचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले आहेत. जरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी दिली जाते. पण गावाकडे जायला मात्र मनाईच आहे. मुंबईत पाय ठेवल्यापासून त्यांचे मतदारसंघात जाणे बंद झाले आहे. सत्तेचा खेळ आज-उद्या संपेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच पहिला आठवडा त्यांना काहीच वाटले नाही, आता मात्र सत्ता कोणाची आलीच नाही, राष्ट्रपती राजवट मात्र लागू झाली यामुळे ते शंकीत झाले आहेत. लगेचच निवडणूक लागली तर काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. त्यातही जे अगदीचनिसटत्या मतांवर निवडून आले त्यांनी तर आता नव्याने निवडणुकीची धास्तीच घेतली आहे. पुन्हा त्या लढाईला तोंड द्यायचे, याचा त्यांच्या अंगावर काटाच येतो आहे.निवडणुकीच्या आधी त्यातही बरेच जोरात असलेल्या भाजपच्या आमदारांच्या पोटात तर गोळाच आला आहे. बदललेल्या राजकारणात भाजपची लोकप्रियता ओसरली आहे याची कुणकुण त्यांनाही लागली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने निवडणुकांची जास्त भीती वाटते आहे. राजकारणात आमदार म्हणजे वरची पायरी समजली जाते. राज्याच्या राजकारणात प्रवेश होत असल्याने अनेकांना आमदार होण्याची हौस असते. विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेण्याचे स्वप्न अनेकजण राजकारणात पाय ठेवल्यापासून पाहत असतात. आमदार झालो, ते स्वप्न पूर्ण होणार की नाही. आमदार म्हणून मतदारसंघात, राज्यात मिरवता येणार की नाही, याची शंका या आमदारांना भेडसावत आहे..........प्रस्थापित पक्षांची नीतीशून्य वर्तणूकप्रस्थापित राजकीय पक्षांच्या नीतीशून्य राजकारणामुळेच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या राज्य शाखेने केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ‘युती करून आपण निवडणूक लढवली व आता मुख्यमंत्रिपदासाठी भांडण करून युती मोडत आहोत, यात जनतेने युतीला मतदान केले आहे याचे भानच शिवसेना, भारतीय जनता पार्टीला राहिलेले नाही. मतदारांना गृहीत धरून त्यांनी काडीमोड घेतला आहे. यात जनतेचा विश्वासघात याशिवाय दुसरे काहीही नाही. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनाही जनहितापेक्षा पक्षहित महत्त्वाचे वाटते आहे. शिवसेनेला त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी जाताना काहीही वाटत नाही. त्यांना पाठिंबा द्यायचा सोडून काँग्रेस पक्षहित महत्त्वाचे मानते आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्तेत जाण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. या प्रमुख पक्षांच्या नीतीशून्य वर्तणुकीमुळेच  व्यवस्थित निवडणुका होऊनही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली आहे.’  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MLAआमदार