शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:19 IST

सरकार स्थापन होईना : नव्याने निवडणुकीची बसली धास्ती

ठळक मुद्देजरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच

पुणे : आधी उमेदवार मिळविण्याची लढाई, त्यानंतर निवडून येण्यासाठीची धडपड व आता निवडून आल्यानंतर, तब्बल १८ दिवस झाले, तरी साधी शपथही घ्यायची संधी मिळाली नसल्याने नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा विरस झाला आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट म्हणजे पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे की काय, याची धास्ती त्यातील काठांवर निवडून आलेल्यांना बसली आहे.मुंबईत सध्या सुरू असलेले राजकारण या नव्याने निवडून आलेल्या आमदारांना कळेनासे झाले आहे. विजयाचा गुलाल अंगावर असतानाच आमदारकीची शपथ थेट विधानसभेत घेण्यातील नवेपण त्यांना अनुभवायचे होते. त्यालाच धक्का बसल्याने त्यांच्यातील बरेचजण वैतागले आहेत. त्यातच पक्ष मतदारसंघात जाऊ द्यायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच केली आहे. कोणाचे आमदार जयपूरला, तर कोणाचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले आहेत. जरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी दिली जाते. पण गावाकडे जायला मात्र मनाईच आहे. मुंबईत पाय ठेवल्यापासून त्यांचे मतदारसंघात जाणे बंद झाले आहे. सत्तेचा खेळ आज-उद्या संपेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच पहिला आठवडा त्यांना काहीच वाटले नाही, आता मात्र सत्ता कोणाची आलीच नाही, राष्ट्रपती राजवट मात्र लागू झाली यामुळे ते शंकीत झाले आहेत. लगेचच निवडणूक लागली तर काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. त्यातही जे अगदीचनिसटत्या मतांवर निवडून आले त्यांनी तर आता नव्याने निवडणुकीची धास्तीच घेतली आहे. पुन्हा त्या लढाईला तोंड द्यायचे, याचा त्यांच्या अंगावर काटाच येतो आहे.निवडणुकीच्या आधी त्यातही बरेच जोरात असलेल्या भाजपच्या आमदारांच्या पोटात तर गोळाच आला आहे. बदललेल्या राजकारणात भाजपची लोकप्रियता ओसरली आहे याची कुणकुण त्यांनाही लागली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने निवडणुकांची जास्त भीती वाटते आहे. राजकारणात आमदार म्हणजे वरची पायरी समजली जाते. राज्याच्या राजकारणात प्रवेश होत असल्याने अनेकांना आमदार होण्याची हौस असते. विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेण्याचे स्वप्न अनेकजण राजकारणात पाय ठेवल्यापासून पाहत असतात. आमदार झालो, ते स्वप्न पूर्ण होणार की नाही. आमदार म्हणून मतदारसंघात, राज्यात मिरवता येणार की नाही, याची शंका या आमदारांना भेडसावत आहे..........प्रस्थापित पक्षांची नीतीशून्य वर्तणूकप्रस्थापित राजकीय पक्षांच्या नीतीशून्य राजकारणामुळेच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या राज्य शाखेने केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ‘युती करून आपण निवडणूक लढवली व आता मुख्यमंत्रिपदासाठी भांडण करून युती मोडत आहोत, यात जनतेने युतीला मतदान केले आहे याचे भानच शिवसेना, भारतीय जनता पार्टीला राहिलेले नाही. मतदारांना गृहीत धरून त्यांनी काडीमोड घेतला आहे. यात जनतेचा विश्वासघात याशिवाय दुसरे काहीही नाही. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनाही जनहितापेक्षा पक्षहित महत्त्वाचे वाटते आहे. शिवसेनेला त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी जाताना काहीही वाटत नाही. त्यांना पाठिंबा द्यायचा सोडून काँग्रेस पक्षहित महत्त्वाचे मानते आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्तेत जाण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. या प्रमुख पक्षांच्या नीतीशून्य वर्तणुकीमुळेच  व्यवस्थित निवडणुका होऊनही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली आहे.’  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MLAआमदार