शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:51 IST

Maharashtra Vidhan Sabha Election : रात्रीपासून भेटीगाठी-मसलतींना वेग

ठळक मुद्देलोकशाहीच्या उत्सवातील जाहीर प्रचाराचा पहिला टप्पा आता संपणार येत्या सोमवारी (दि.२१) सर्व उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार मतदारसंघांत गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी आणि आश्वासनांचा पाऊस

पुणे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी (दि.१९) संध्याकाळी सहा वाजता थांबणार आहे. विविध नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली आदींनी ढवळून निघालेले पुणे शनिवारी रात्रीपासून शांत होणार आहे. त्यानंतर पुढचे ४८ तास भेटीगाठी, गुप्त मसलती, संपर्क यांना जोर चढणार आहे. येत्या सोमवारी (दि.२१) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. पुण्यातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या आठ मतदारसंघांत गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी आणि आश्वासनांचा पाऊस पडत होता. दर पाच वर्षांनी येणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवातील जाहीर प्रचाराचा पहिला टप्पा आता संपणार आहे. मतदानाच्या दुसºया टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून येत्या सोमवारी (दि.२१) सर्व उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. ‘ईव्हीएम’च्या वापरासंबंधीचे तांत्रिक प्रशिक्षण सरकारी कर्मचारी-अधिकाºयांना देण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीही सरकारी पातळीवरून तसेच विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मतदानासाठी केवळ ४८ तास उरले असल्याने सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी उरलेले ४८ तास महत्त्वाचे असणार आहेत. मतदारांना मतदान चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम अनेक उमेदवारांनी पूर्ण केले आहे. उरलेल्या काही तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि बुथ यंत्रणा कामाला लावण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. .....४प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांनी जाहीर सभांवर जोर न देता मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. प्रचारफेºया, दुचाकी रॅलीचे आयोजन उमेदवारांनी केले आहे. ........आरोप-प्रत्यारोपांनी ढवळले शहरशहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीच्या वतीने २०१९ च्या निवडणुकीतही या आठही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षांचे आव्हान आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपच्या विद्यमान आमदारांना विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात आले होते. त्याला तितकेच जोरदार प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले. यातल्या कोणाचा प्रभाव मतदारराजावर पडला, याचे उत्तर सोमवारी ईव्हीएममध्ये बंद होणार आहे..........राज्य-राष्ट्रीय नेत्यांची प्रचारासाठी हजेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, रामदास आठवले, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, लडाखचे खासदार जम्यांग नामग्याल यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांनी भाजपसाठी मते मागितली. तुलनेने काँग्रेसचा प्रचार अत्यंत स्थानिक पातळीवरचा राहिला. राष्ट्रीय नेत्याकरिता लेतप्लँग, काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद, तेलंगणाचे खासदार रेवंश रेड्डी यांच्या व्यतिरीक्त काँग्रेसच्या प्रचारात फार कोणी सहभागी झालेले दिसले नाही. ‘राष्ट्रवादी’कडून अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचार केला. मात्र, राज्यभर दौरे करणाºया शरद पवारांनी पुण्यात यंदा सभा घेतली नाही. विरोधी पक्षाच्या प्रचारांची उणीव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सभांनी भरून काढली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMNSमनसेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019