शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: अवकाळीने राज्यात ९० हजार हेक्टरवरील पिकांना अवकळा; १७ जिल्ह्यांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:20 IST

राज्यातील सुमारे १७ जिल्ह्यांमध्ये या पावसाने शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील संत्रा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे....

पुणे : राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ३४ हजार हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्षासारख्या व्यापारी पिकांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. राज्यातील सुमारे १७ जिल्ह्यांमध्ये या पावसाने शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील संत्रा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात शनिवारी व रविवारी पाऊस झाला. त्यात रविवारी सुमारे १७ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगले झोडपून काढले. त्यामुळे शेतांमधील उभी पिके जमीनदोस्त झाली असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो यासारख्या पिकांचा समावेश आहे.

राज्यात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये ठाणे जिल्ह्यात १८, पालघर २६, नाशिक २७, धुळे २६, नंदूरबार ६२, जळगाव ३२, नगर ३१, पुणे १४, संभाजीनगर ६१, जालना ७१, बीड २७, नांदेड ३६, परभणी ६५, बुलढाणा ६०, अकोला ३२, वाशिम ५०, अमरावती १४, यवतमाळ २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व विदर्भ वगळता राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली.

गारपिटीमुळे झालेले नुकसान मोठे असून नाशिक, नगर व नंदुरबार जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा व टोमॅटो पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर इतके झाले असून नाशिक जिल्ह्यातही सुमारे ३० हजार हेक्टरी पिकांना या गारपिटीचा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नगर जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पुणे जिल्ह्यात सुमारे ३ हजार ५०० हेक्टर, धुळे जिल्ह्यात ४ हजार ६००, नंदुरबार जिल्ह्यात २००० त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, जळगाव, सातारा, जालना, संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात व्यक्त करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रांवर पावसाची नोंद होत असली तरी गारपिटीची नोंद करणे शक्य नसल्याने त्याची तीव्रता नेमकी किती व कशी होती, याची नोंद करण्याची यंत्रणा नसल्याने हे नुकसान आणखी वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई अशा पिकांना मात्र या पावसाचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

या पावसामुळे संत्र्याचा अंबिया बहारासाठीचा ताण तुटला. त्यामुळे येणारा बहर हाती येणार नाही. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

- संदीप घुले, सर्फापूर, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

पुढील काही दिवस राज्यात अजूनही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर कृषी विभाग पंचनाम्याचे काम सुरू करेल.

- प्रवीण गेडाम, आयुक्त, कृषी

टॅग्स :RainपाऊसbuldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र