शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

By राजू इनामदार | Updated: November 14, 2024 22:11 IST

महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते.

पुणे: मनूच्या आधारावर राज्य घटना तयार करावी असे म्हणणारे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची आठवण काढतात. ते तर घरावर तिरंगाही लावत नव्हते अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरूवारी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. नेताजी बोस, सरदार पटेल यांची आज नावे घेता, पण स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही कुठे होता असा खडा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते. जाहीर सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद त्यांच्यासमवेत होते. "मी ५३ वर्षे राजकारणात आहे. अनेक निवडणूका पाहिल्या, पण राज्यांच्या निवडणूकीत पंतप्रधान, ग्रुहमंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरताना कधीही पाहिले नाही. ते येतात आणि गांधी कुटुंबाला शिव्या घालतात. महाराष्ट्रात राहुल गांधी मुख्यमंत्री होणार आहेत का? पण ते त्यांच्यावरच टीका करतात. कारण तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे," असं खरगे यांनी म्हटलं.

"तुम्ही देशात, महाराष्ट्रात काय करणार आहात ते सांगा, पण ते तसे काहीही बोलत नाहीत अशी टीका करून खर्गे म्हणाले, "तूम्ही भ्रष्टाचारी आहात असे सांगून त्यांनी काहीजणांना धमकावले व नंतर त्यांनाच बरोबर घेतले. देशात महागाई वाढली, अन्नधान्य महाग झाले, बेरोजगारी वाढली. त्यावर बोलले तर ठीक आहे, पण ते इथले प्रोजेक्ट तिकडे घेऊन चालले आहेत. सत्ता बदलण्यासाठी ते काहीही करतात. महाराष्ट्र मणीपूर गोवा अशी कितीतरी ऊदाहरणे आहेत. खोके आणि सबकुछ ओके अशी त्यांची पद्धत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या सर्व घोषणांची अमलबजावणी काँग्रेसच्या सरकारांनी सत्तेवर आल्यानंतर केली. आम्ही बजेट पाहूनच घोषणा करतो व त्या अमलातही आणतो. आमच्याकडे डोके आहे, तुमच्याकडे खोके आहे," असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

बटेंगे तो कटेंगे या घोषणेचाही खरगे यांनी समाचार घेतला. देश एकच आहे व तो एकच ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस नेहमीच तयार असते असेही खरगे यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PuneपुणेMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा