शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:57 IST

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये उपनगरांमधील अधिक महाविद्यालयांचा समावेश असल्याचे दिसते. पसंतीक्रमात २ ते १० मध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न घेता पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाºया या प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत अकरावीची सुमारे ९१ हजार प्रवेश क्षमता असून त्यासाठी सुमारे ७८ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदाही रिक्त जागांचा आकडा मोठा असेल. पहिल्या दोन फेºयांमध्ये हे चित्र ठळकपणे दिसून आले आहे.पहिल्या फेरीत १४ हजार ६७२, तर दुसºया फेरीत १० हजार ५३१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे घेतलेले प्रवेश रद्दही केले आहेत. या दोन फेºयांअखेर सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत प्रवेश घेतला आहे. तर, कोट्यातील प्रवेशासह हा आकडा सुमारे ४७ हजार एवढा आहे. तिसºया फेरीसाठी १४ हजार ३९२ विद्यार्थ्यांची निवड झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेश घेणारे विद्यार्थी पहिल्या दोन्ही फेºयांप्रमाणे कमी असतील. त्यामुळे या फेरीअखेरीस ५५ ते ६० टक्केच प्रवेश होतील, अशी शक्यता आहे. समितीने या वर्षीपासून पसंतीक्रमांक २ ते १० नुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे अनेक विद्यार्थी निवड होऊनही प्रवेश घेण्याचे टाळत आहेत. चांगले महाविद्यालय मिळेल, या आशेने ते पुढील फेरीत सहभागी होत आहेत. परिणामी, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप ५० टक्केहीप्रवेश झालेले नाहीत. विद्यार्थ्यांकडून प्रामुख्याने शहराच्या मध्य भागातील महाविद्यालयांना पसंती मिळत आहे. त्यामुळे उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची टक्केवारी कमी दिसत आहे.कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची एकूण ६४० प्रवेश क्षमता आहे. पहिल्या दोन फेºयांपर्यंत इनहाऊस कोट्यासह २८० प्रवेश झाले आहेत. मागील वर्षीपर्यंत दोन फेºयांमध्ये किमान ४०० प्रवेश होत होते. उपनगरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. पुढील फेरीत प्रवेश होतील, असे समितीकडून सांगितले जात आहे.- संजय सोमवंशी, प्राचार्यगेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय