शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची खासगी वाहनांकडून लूट; 6 ते 7 किलोमीटरसाठी 5 ते 7 हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 11:05 IST

दोन- दोन किलोमीटर पायपीट : प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र संताप

तळेघर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकराच्या दर्शनासाठी नाताळ सुटीनिमित्त व नवीन वर्ष स्वागतासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. भाविकांना वाहनतळ ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या मिनीबस उपलब्ध नसल्याने काही भाविकांना दोन- दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे तर काही भाविकांची खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहेत. या मानसिक त्रासामुळे अनेक भाविकांनी देवस्थान व प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री, श्रावण महिना व नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी दरवर्षीच उच्चांक गर्दी होत असते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शासनानी लादलेल्या निर्बंधामुळे काही प्रमाणात गर्दी कमी झाली होती; परंतु, चालू वर्षी सुरुवातीपासूनच रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. सध्या नाताळ सुटी, नववर्ष स्वागतासाठी पर्यटक भाविक भक्तांप्रमाणेच शालेय सहलीमुळे भाविकांची गर्दी होऊन भीमाशंकर परिसर गजबजलेला आहे; परंतु, भीमाशंकर येताच अलीकडे सहा ते सात किमीपासूनच भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोंढवळ फाट्यादरम्यान नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. तर पार्कींग नंबर तीनपासून बस स्टॅंडपर्यंत वाहनचालक हे वाहने आडवी- तिडवी लावत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहेत. अपंग विकलंग, लहान मुले, वयवृद्ध माणसे यांचे प्रचंड हाल होत आहेत. वयोवृद्ध माणसे लहान मुले यांना कडक उन्हामध्ये दोन दोन किमी अंतरावर पायपीट करावी लागते. अनेक व्यक्तींना हृदयविकार त्याचप्रमाणे अनेक आजार असतानाही दोन किमी चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, याचे काही सोयरसुतक प्रशासनाला नाही. दरम्यान, याच संधीचा फायदा घेत खासगी वाहतूक करणारे हे बाहेरून आलेल्या भाविकांना वेठीस धरत अर्धा ते एक किलोमीटरसाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी घेत आहे. तर मोटारसायकल चालक प्रति व्यक्तिमागे सहाशे ते सातशे रुपये घेऊन भाविकांची आर्थिक लूट करत आहे. तर हेच खासगी वाहनचालक इतर दिवशी मंदिरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या निगडाळेजवळील कालभैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या एका शेतामध्ये मोठ्या बससाठी वाहनतळांवर तयार करून भीमाशंकरला येणारे बसमधील भाविक व शालेय सहलीतील विद्यार्थ्यांना पुढे रस्त्याचे काम चालू आहे. बस पुढे जात नाही. असे सांगत पाच ते सहा हजार रुपये घेत आपल्या जवळील खासगी वाहनाने त्यांना थेट मंदिरापर्यंत नेत आहे. मात्र, यामध्ये सामान्य भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग त्याचप्रमाणे पर्यटनाचे ठिकाण आहे. महाशिवरात्री व श्रावण यात्रा सोडल्या तर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. ना वाहतुकीचे नियोजन ना इतर सोयी- सुविधांचे नियोजन भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना संताप व्यक्त करतच जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात हाेणाऱ्या गर्दीमध्ये कोणता अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण, असा प्रश्न येणाऱ्या भाविकांना पडला आहे.

''प्रशासनाकडून हाेणारी वाहतूक ही कायमस्वरूपी बंद करून प्रशासनाने ठोस पावले उचलत कायमस्वरूपाची व्यवस्था द्यावी. - जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव'' 

''श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मिनीबस नियोजनाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. - वसंत अरगडे, आगार व्यवस्थापक'' 

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरPoliceपोलिस