शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन निरुपयोगीच, रात्रीचे निर्बंधही बिनकामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे कोरोना साथ विषयक सल्लागार डॉ. सुभाष साळूंके यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्याबरोबरच रात्रीच्या लॉकडाऊनचाही काहीही फायदा होत नाही, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.

“लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे कोरोना पसरत आहे. मास्क घालणे, सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे या निर्बंधांची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याच्या प्रसंगाला मंगळवारी (दि. ९) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे ‘लोकमत’शी बोलत होते.

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धतीत काही बदल झालेला नाही, असे निरिक्षण डॉ. साळुंखे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालये आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता ‘कोरोना’सह जगण्याची सवय करायला पाहिजे. डॉ. साळुंखे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -

चौकट

वाढत्या रुग्णसंख्येविषयी

-दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसे वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. निवडणुका झाल्या, शाळा-महाविद्यालये सुरू झाली पण कोरोना विषाणू गेलेला नव्हता.

-सुरुवातीला वाटत होते की हे म्युटेशन आहे का? पण तसे काही गंभीर म्युटेशन नसल्याचे स्पष्ट झालं. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८ हजारावे म्यूटेशन आहे. पण व्हायरसची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदललेली नाहीये हे लक्षात आले. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगीकरण नीट करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब ‘पॉझिटिव्ह’ होत आहे.

चौकट

चाचण्या वाढवा

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. आता पूर्ण लॉकडाऊनला कोणाचीच सहमती असणार नाही. पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्नकार्ये पुढे ढकला. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा विचार काही महिने तरी करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्यावर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीच्या संचारबंदीचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही, तो पँन्डेमिक न राहता एन्डेमिक म्हणून राहील.

चौकट

प्रत्येकाला टोचा लस

लसीकरण झाले म्हणजे निश्चित व्हाल असे नाही तर त्यानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरणासोबतच कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालकांकडे मी आग्रह करतो आहे की आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्याकडे वय वर्षे १८ च्या आत लसीकरणाची परवानगी नाही. पण त्यावरील सर्वांचे लसीकरण येत्या महिनाभरात होणे गरजेचे आहे.