शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

लोकसंस्कृती जपणाऱ्या मरिआईवाल्यांचे जीवन उपेक्षितच

By admin | Published: January 23, 2017 2:31 AM

अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात

गोलेगाव : अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात ज्याप्रमाणे बारा बलुतेदारांना महत्त्व होते, तसेच महत्त्व मरिआईवाले, नंदीवाले, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी आदींना होते. भटके जीवन जगणाऱ्या या लोकांचे आजही हलाखीचे व उपेक्षितच जगणे चालू असल्याची वेदना मरिआईवाले सुखदेव रंगप्पा देवकर व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या पिनौर या छोट्याशा खेडेगावातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब शेकडो किलोमीटर भटकंती करत आहे. मरिआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन आलेली महिला व हातातील आसुडाने उघड्या अंगावर फटके मारणारा देवीचा भक्त व त्या आसुडाच्या कडकड आवाजाने भेदून निघणारे आसमंत यामुळे काही काळ सर्वत्र अभेद्य अशी शांतता पसरते. मरिआईवाली महिला आपल्याजवळील ढोलातून गुबुगुबु आवाज काढून देवीच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण देत असते.(वार्ताहर)४मरिआईची मनोभावे पूजा केल्याने घरातील व गावातील संकट, रोगराई, इडापिडा नष्ट होत असल्याची भावना लोकांमध्ये असते. मरिआईवाले देवीच्या नावाने लोकांना आशीर्वाद देऊन चालू वर्षीच्या पावसाचा अंदाज तसेच संक्रांतीबद्दल माहिती सांगत असल्याने लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. मुलांना आमच्यासारखे वाईट दिवस नकोत म्हणून कर्जतला शासकीय वसतिगृह व शाळेत ठेवले असून तीनही मुले आपल्याजवळ नसल्याची वेदना अश्रुरूपातून जाणवली. त्याचप्रमाणे मुलांना चांगले शिक्षण व नोकरी देण्याची सरकारकडून अपेक्षा असल्याचे बोलून दाखविले. तसेच वाढते शहरीकरण व आधुनिकतेमुळे लोकांना मरिआईचे महत्त्व कमी होऊ लागल्याने पहिल्यासारखी कमाई होत नसल्याचेही सांगितले.