शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

...असा उघडा संसार, माय उपाशी झोपली! लॉकडाऊनमुळे ऊसतोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:53 IST

लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत.

ठळक मुद्दे६० हजार ७९३ स्थलांतरीत मजूर आणि १ लाख १९ हजार २७३ मजुरांच्या भोजनाची प्रशासनाने केली व्यवस्था पुणे विभागात ६६४ रिलीफ कॅम्प

धनाजी कांबळे- पुणे : उसतोडणीचा हंगाम संपला असला, तरी उसतोडणी कामगारांचे दु:ख काही संपलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या येतात आणि हंगाम संपताच आपल्या गावी निघून जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील पलूस येथील बोरजाईनगर गंजीखाना येथे ६०-६५ लहानमोठी बायाबापडी राहत आहेत. यात दोन महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. हे चित्र बहुतांश सर्वच कारखान्यांच्या भागांत पाहायला मिळत आहे. याबाबत साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.काळा रापलेला देह. फाटकी पँट. अंगात बंडी. नाकाच्या खाली काळ्याभोर मिशा. कानात बाळी. पायात पायताण आणि हातात धारदार चकाकी कोयता घेतलेला मुकादम सांगेल तसं, म्हणेल त्या फडात थंडीवाऱ्यात, उन्हात राबणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या वाट्याला सध्या उपासमारी आली आहे. लॉकलाउनमध्ये पोटालाच खायला काय नाही, तर शिकायचा सवालच उरत नाही, अशी अवस्था आहे. गावाच्या बाहेर वस्ती असल्याने परिसरातील लोक मदतीसाठी पुढे येतील, ही केवळ भाबडी आशा ठरत आहे. पलूसमध्ये उतरलेली ही टोळी. दीड महिन्यांपूर्वीच या पालावर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

गेल्या चाळीस दिवसांपासून ते या भागात आहेत. मागच्या आठवड्यात नगरपरिषदेने काही धान्य दिलं होतं. पण, आता तेही संपलं आहे. सरकारी बाबूंना वाटतंय आमच्यातली काही लोकं खोटं बोलतात. त्यांना गावाकडं जायची घाई झालीय म्हणून पोटाला नाही, म्हणतात, असे बोलतात. पण पोटात आग पडल्यावर कोण काय बोलतय यापेक्षा भूक मोठी असते साहेब. ५ किलो बाजरी आणि ३ किलो तांदूळ मिळालं होतं. त्यात कसंतरी भागवणं सुरु आहे. दोन दिवसांपासनं आभाळ भरून येतयं, कुठं राहावं आणि काय करावं, डोकं काम करेना, असे पन्नाशीत पोचलेले बाळू वीर सांगत होते. मुरली शिदे, महादेव मल्हारी, श्रीहरी, दशरथ, जितेंद्र, रामहरी वीर, सिद्धार्थ सुरवसे, राजेंद्र खेमाडे, दीपक बनसोडे, प्रशांत भडगीळे, अभिमान केदार, शुभम कोरडे आदी तीन टोळयांचे लोक बोरजाईनगर, गंजिखाना या भागात २४ झोपड्यांमध्ये राहत आहेत. मूळचे बीड जिल्ह्यातील करचुंडी, धानोरा येथील असलेल्या या लोकांना गावी जाण्याची ओढ आहे, मात्र, लॉकडाउनमुळे ते केवळ अशक्य आहे. कवी ज्ञानेश्वर कोळी यांच्या शब्दांत...तोड उसाची संपली,आम्ही निघालो गावाला,कोस कोस दूर गाव,माळ डोळ्यात साठला...या ओळी प्रत्यक्षात आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत कामगारांना जगाव्या लागत असल्याचे भयान वास्तव प्रशासनाने गांभीर्याने ध्यानात घेऊन यावर ठोस निर्णय घ्यावा, अशीच या कामगारांची विनवणी आहे.................पुणे विभागात ६६४ रिलिफ कॅम्प...पुणे विभागात ६६४ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये ६० हजार ७९३ स्थलांतरीत मजूर आणि १ लाख १९ हजार २७३ मजुरांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. मात्र, काही उसतोडणी कामगारांपर्यंत अद्यापही मदत पोचलेली नसून, प्रशासनाने तत्काळ अशा बेघर कामगारांची व्यवस्था करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कॉ. धनाजी गुरव, पर्यावरण मित्र शरद झरे, बाळासाहेब मोटे यांनी केली आहे.---उसतोडणी कामगारांना मदतीची गरज असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करणार आहोत.- राजेंद्र पोळ, तहसीलदार

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस