शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

SSC Board Exam: उशीरा येणा-यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 21:48 IST

परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे

पुणे : दहावी -बारावीच्या परीक्षेस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा परीक्षा केंद्रावर येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आशय आढळून येत आहे. त्यामुळे परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.       दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेसाठी दिलेल्या वेळेपेक्षा (सकाळच्या सत्रात साडेदहा, दुुपारच्या  सत्रात तीन वाजता) उशीरा येणा-या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने कार्यपद्धत ठरवली होती. त्यानुसार वेळेनंतर दहा मिनिटे उशीरा येणा-या विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर चौकशी करून त्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जात होती. तसेच वीस मिनिटांनंतर परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्याला विभागीय मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिवांच्या परवानगी परीक्षेसाठी प्रवेश दिला जात होते. परंतु,राज्यात काही ठिकाणी परीक्षेला उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय असल्याचे अढळून आले. त्यामुळे राज्य मंडळाने कठोर पावले उचलत परीक्षेला उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे,असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

सर्व शाळांना महत्त्वाच्या सूचना ...

 - विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.- विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी वर्गात उपस्थित असणे गरजेचे-  परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये- परीक्षा कक्षात मोबाईल किंवा तत्सम साधने वापरता येणार नाहीत- काही अपरिहार्य कारणामुळे सकाळच्या सत्रात साडेदहा वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात तीन वाजेपर्यंत विद्यार्थी उशीरा आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्याची तपासणी करून विभागीय मंडळाच्या परवानगीने त्याला परीक्षेला बसू द्यावे.

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र