शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका

By श्रीकिशन काळे | Published: March 14, 2024 3:16 PM

येत्या २७ मार्चला तुकाराम बीज असल्याने लाखो भाविक इंद्रायणीकाठी येतात, स्नानही करतात, परंतु सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी दूषित झाली आहे

पुणे : प्रदूषित पाण्यामुळे देहू येथील इंद्रायणीनदीतील महाशीर माशांचा जीव गेला. त्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याची दखल घेतली आहे. घटनास्थळीची पाहणी करून ‘सीईओ’ला नोटीस बजावणार असल्याचा पवित्रा मंडळाने घेतला आहे. माशांचा मृत्यू कशामुळे झाला, त्याची माहिती अधिकारी घेत आहेत. तसेच पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.

इंद्रायणीनदीमध्ये भाविक येऊन अंघोळ करत असता. तसेच या नदीतील महाशीर माशांना इतिहास आहे. ते येथील स्थानिक मासे असून, त्यांचा उल्लेख संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून आहे. विठ्ठलाच्या कानाशी या माशांचा संबंध आहे. त्यामुळे या माशांना एक वेगळे महत्त्व आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुकाराम बीज असल्याने लाखोच्या संख्येने भावीक इंद्रायणीकाठी येत असतात. त्यामुळे नदीचे पाणी जर प्रदूषित असेल तर या भाविकांना विविध आजार होण्याचा धोका देखील आहे. त्यामुळे यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

देहू आणि परिसरातील सांडपाणी थेट नदीत जात असल्याने हे मासे मरत आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. ते स्थानिक प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे काम आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या विषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे म्हणाले, आम्ही इंद्रायणीच्या काठी कर्मचारी पाठवले आहेत. ते तेथील पाहणी करून पाण्याचे नमुने घेत आहेत. मासे कशामुळे मेले त्याची चौकशी होईल. गावातील सांडपाणी थेट नदीत जात आहे. तिकडे कारखाने नाहीत. त्यामुळे या सांडपाण्यामुळे मासे मृत झाले. जिल्हा परिषदेचे सीईओ यांना आम्ही याबाबत नोटीस बजावणार आहोत.’’

विठ्ठलाच्या कानात महाशीर !

महाशीर हा मासा सिप्रिनिडाई (Cyprinidae) कुळातील आहे. हा मासा संकटग्रस्त यादीत आहे. मध्य प्रदेश सरकारने तर या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. नर्मदा नदीत देखील हा मासा आढळतो. महाशीर मासा श्रृंगारासारखा वापरला जातो. विठ्ठलाच्या कानात हेच मासे आपल्याला पहायला मिळतात. 

टॅग्स :Puneपुणेdehuदेहूindrayaniइंद्रायणीriverनदीpollutionप्रदूषणsant tukaramसंत तुकाराम