शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 19:42 IST

२०६ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावली

कोरेगाव भीमा: भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी सोमवारी २०६ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी विविध पक्ष , सामाजीक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते.

पेरणे फाटा येथे काल मध्यरात्रीपासुनच मोठ्या प्रमाणावर मानवंदनेसाठी गर्दी करण्यात आली होती. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील नियोजित कार्यक्रमास कालपासूनच सुरवात झाली. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. 

मानवंदनेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार अमोल कोल्हे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, चंद्रकांत हंडोरे पिपल्स रिपबलीकन पार्टिचे जोगेंद्र कवाडे, बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराज आंबेडकर, रिपब्लीकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, बापू पठारे, जोगेंद्र कावडे, भारतीय दलीत कोर्बाचे भाई विवेक चव्हाण, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सजेर्राव वाघमारे, भीमा कोरेगाव समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांसह आदींनी सदर ठिकाणी अभिवादन केले.

यामुळे होते मानवंदनेसाठी गर्दी

कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजीमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजीमेंटच्या अनेक शुरविरांना वीरमरन आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.

स्तंभावर प्रशासनाचे सुरेख नियोजन

ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या १३ मार्गिकांच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारGovernmentसरकारDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliceपोलिसSocialसामाजिक