शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:37 IST

काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे..

ठळक मुद्दे युवक क्रांतिवीर पुरस्काराचे वितरणआम्ही लडाखवासीय भारताचाच भाग भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्ध लडाखच्या भूमीवरून लढले गेलेसीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय

पुणे : मुंबई-दिल्लीमध्ये पर्यटनला आले असता आमच्या चेहरापट्टीवरून तुम्ही चिनी, नेपाळी आहात का? असा प्रश्न आमच्याच भारतीय बंधूंकडून विचारला जातो. आम्ही लडाखवासीय भारताचाच भाग असून, आम्ही आमच्या बांधवांच्या परिचयाचे नाहीत, या जाणिवेने मनाला यातना होतात. भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्धलडाखच्या भूमीवरून लढले गेले. त्यामुळे ‘युद्धभूमी’ अशीदेखील एक ओळख तिला प्राप्त झाली आहे. परंतु लडाखची ओळख युद्धभूमी नव्हे, तर बुद्धभूमी अशी व्हावी, अशी इच्छा लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केली.श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी, पूर्णवाद युवा फोरम आणि जीवन कला मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा ‘युवक क्रांतिवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना अ‍ॅड. विद्यासागर, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ त्या वेळी नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. या वेळी व्यासपीठावर अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल संत, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया, एस.एन.बी.पी. शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. दशरथ भोसले, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील, पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, अ‍ॅड. गणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर आणि सचिन इटकर उपस्थित होते.या वेळी जीवनकला मंडळातर्फे दर वर्षी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना, तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात आला..........

गेल्या ७० वर्षांपासून आमचे भारतीय आस्तित्व नव्हते. ३७० कलमाद्वारे मोदीसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला ओळख मिळाली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे. सीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय आहे. ‘सवाल करो, बवांल मत करो’ या मताचा मी आहे. प्रश्न विचारणे हे जिवंत लोकशाहीचे द्योतक आहे. शिस्त, समाधी आणि ज्ञान या त्रिसूत्रींवरच भारत प्रगती करू शकेल. कोणत्याही विचारधारेची ही त्रिसूत्री हा पाया पाहिजे. कोणत्याही घटनेचे विश्लेषण होऊन सामाजिक माध्यम फॉलो झाले पाहिजे. जाम्यांग त्सेरिंग नामग्याल, खासदार

टॅग्स :Puneपुणेladakhलडाखwarयुद्धIndian Armyभारतीय जवानBJPभाजपा