शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:37 IST

काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे..

ठळक मुद्दे युवक क्रांतिवीर पुरस्काराचे वितरणआम्ही लडाखवासीय भारताचाच भाग भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्ध लडाखच्या भूमीवरून लढले गेलेसीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय

पुणे : मुंबई-दिल्लीमध्ये पर्यटनला आले असता आमच्या चेहरापट्टीवरून तुम्ही चिनी, नेपाळी आहात का? असा प्रश्न आमच्याच भारतीय बंधूंकडून विचारला जातो. आम्ही लडाखवासीय भारताचाच भाग असून, आम्ही आमच्या बांधवांच्या परिचयाचे नाहीत, या जाणिवेने मनाला यातना होतात. भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्धलडाखच्या भूमीवरून लढले गेले. त्यामुळे ‘युद्धभूमी’ अशीदेखील एक ओळख तिला प्राप्त झाली आहे. परंतु लडाखची ओळख युद्धभूमी नव्हे, तर बुद्धभूमी अशी व्हावी, अशी इच्छा लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केली.श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी, पूर्णवाद युवा फोरम आणि जीवन कला मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा ‘युवक क्रांतिवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना अ‍ॅड. विद्यासागर, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ त्या वेळी नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. या वेळी व्यासपीठावर अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल संत, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया, एस.एन.बी.पी. शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. दशरथ भोसले, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील, पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, अ‍ॅड. गणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर आणि सचिन इटकर उपस्थित होते.या वेळी जीवनकला मंडळातर्फे दर वर्षी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना, तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात आला..........

गेल्या ७० वर्षांपासून आमचे भारतीय आस्तित्व नव्हते. ३७० कलमाद्वारे मोदीसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला ओळख मिळाली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे. सीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय आहे. ‘सवाल करो, बवांल मत करो’ या मताचा मी आहे. प्रश्न विचारणे हे जिवंत लोकशाहीचे द्योतक आहे. शिस्त, समाधी आणि ज्ञान या त्रिसूत्रींवरच भारत प्रगती करू शकेल. कोणत्याही विचारधारेची ही त्रिसूत्री हा पाया पाहिजे. कोणत्याही घटनेचे विश्लेषण होऊन सामाजिक माध्यम फॉलो झाले पाहिजे. जाम्यांग त्सेरिंग नामग्याल, खासदार

टॅग्स :Puneपुणेladakhलडाखwarयुद्धIndian Armyभारतीय जवानBJPभाजपा