शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:41 IST

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट..

ठळक मुद्देदिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी राज्यकर्ते प्रयत्नशील फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ

पुणे : वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. राजकारण्यांना हे हवेच होते. त्यांनी त्याला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत लोकांच्या विश्वासार्हतेशी तडजोड करण्यास भाग पाडले. याचा गंभीर परिणाम माध्यमांवर झाला. त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. तर वाचकांनी देखील माध्यमांना गृहीत धरणे हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱ्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानाचे वक्ते म्हणून सोमवारी गुप्ता बोलत होते. त्यांनी "आज सर्वाधिक धोका कशाला ? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ? याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, आता माध्यमामध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी अनेकदा जगभरातील राज्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येतात.'आपण स्वत:चीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने आणि हे न आल्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्तां यांनी यावेळी सांगितले. .....................................* फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ आहेत. प्रस्थापित माध्यमातून ज्यावेळी फेक न्यूज सातत्याने दिल्या जातात अशावेळी त्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून भविष्यात फेक न्यूजच्या प्रभावाला वाचकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. अशी टिप्पणी गुप्ता यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारMediaमाध्यमेFake Newsफेक न्यूज