शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
3
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
4
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
5
डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
6
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
7
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
8
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
9
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
10
Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
11
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
12
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
13
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
14
एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
15
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
16
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
17
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
18
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
19
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
20
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:41 IST

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट..

ठळक मुद्देदिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी राज्यकर्ते प्रयत्नशील फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ

पुणे : वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. राजकारण्यांना हे हवेच होते. त्यांनी त्याला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत लोकांच्या विश्वासार्हतेशी तडजोड करण्यास भाग पाडले. याचा गंभीर परिणाम माध्यमांवर झाला. त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. तर वाचकांनी देखील माध्यमांना गृहीत धरणे हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱ्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानाचे वक्ते म्हणून सोमवारी गुप्ता बोलत होते. त्यांनी "आज सर्वाधिक धोका कशाला ? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ? याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, आता माध्यमामध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी अनेकदा जगभरातील राज्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येतात.'आपण स्वत:चीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने आणि हे न आल्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्तां यांनी यावेळी सांगितले. .....................................* फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ आहेत. प्रस्थापित माध्यमातून ज्यावेळी फेक न्यूज सातत्याने दिल्या जातात अशावेळी त्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून भविष्यात फेक न्यूजच्या प्रभावाला वाचकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. अशी टिप्पणी गुप्ता यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारMediaमाध्यमेFake Newsफेक न्यूज