शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:41 IST

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट..

ठळक मुद्देदिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी राज्यकर्ते प्रयत्नशील फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ

पुणे : वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. राजकारण्यांना हे हवेच होते. त्यांनी त्याला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत लोकांच्या विश्वासार्हतेशी तडजोड करण्यास भाग पाडले. याचा गंभीर परिणाम माध्यमांवर झाला. त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. तर वाचकांनी देखील माध्यमांना गृहीत धरणे हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱ्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानाचे वक्ते म्हणून सोमवारी गुप्ता बोलत होते. त्यांनी "आज सर्वाधिक धोका कशाला ? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ? याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, आता माध्यमामध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी अनेकदा जगभरातील राज्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येतात.'आपण स्वत:चीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने आणि हे न आल्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्तां यांनी यावेळी सांगितले. .....................................* फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ आहेत. प्रस्थापित माध्यमातून ज्यावेळी फेक न्यूज सातत्याने दिल्या जातात अशावेळी त्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून भविष्यात फेक न्यूजच्या प्रभावाला वाचकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. अशी टिप्पणी गुप्ता यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारMediaमाध्यमेFake Newsफेक न्यूज