शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 1:00 PM

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती....

- राजू इनामदार

पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणे बेशिस्तीचे समजले जाते. यांनी ते केले; पण काहीच कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘मला तुम्ही उमेदवारी दिली याचा अर्थ तुमच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे नाही. मला जे वाटेल ते बोलण्यास मी मोकळा आहे!’ तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उभी राहिली. तीन-तीन उमेदवार उभे केले गेले. तरीही तेच निवडून आले. तो त्यांचा स्वत:चा हक्काचा मतदारसंघ नव्हता तरीही! त्यांचे नाव आहे केशवराव जेधे.

नुकतीच त्यांची १२८वी जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांचे हे स्मरण. सन १९२२ पासून ते राज्यात सामाजिक व त्यानंतर राजकीय चळवळीत होते. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘देशभक्त’ अशी पदवी दिली होती. ते पुण्यातले; पण काँग्रेसने त्यांना सन १९५७ मध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यांनीही तो मान्य केला; पण ‘मला जे वाटेल ते बोलण्याचा माझा हक्क मी राखून ठेवत आहे!’ असे जाहीरपणे सांगूनच.

संयुक्त महाराष्ट्र समिती :

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती. ही समिती जेधे यांच्याच अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या सभेत स्थापन झाली होती. समितीने काँग्रेसविरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले होते. केशवरावांच्या भूमिकेमुळे समितीने त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार दिला नव्हता; पण त्यावेळच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे एकदोन नव्हे तर तीन जणांनी केशवरावांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवारी दाखल केली.

ना राहण्याचा खर्च, ना खाण्याचा :

केशवराव मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे. रात्री जिथे असतील तिथेच मुक्काम करायचे. सकाळी उठून पुढे निघायचे. चळवळींमधील सहभागामुळे त्यांचा ठिकठिकाणी संपर्क होता. खाण्याचा, राहण्याचा काहीच खर्च यायचा नाही. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी याच पद्धतीने पालथा घातला. बरोबर काही कार्यकर्ते असत. तेच गावांमध्ये बैठका आयोजित करत. त्यात केशवराव बोलत. अवघ्या दोन-पाचशे रुपयांमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली. मतदारसंघातील १ लाख ४७ हजार ७२६ मते वैध ठरली. त्यातील ६३ हजार ३६४ मते केशवरावांना मिळाली. केशवराव सहजपणे निवडून आले.

साधी राहणी :

केशवराव खरे तर धनाढ्य घरातले होते. त्यांचे मोठे दोन बंधू सखारामशेठ व बाबूराव कुटुंबाचा व्यवसाय पाहात. त्यामुळेच केशवराव सामाजिक, राजकीय चळवळींना भरपूर वेळ देऊ शकत. श्रीमंती असूनही केशवराव अत्यंत साधे राहत. बहुजनांविषयी त्यांना कळवळा होता. तरुणपणापासूनच ते बहुजनांना सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत कार्यरत होते. त्यातही त्यांनी तत्त्वाला बाधा येईल, असे काही केले नाही. त्यातूनच त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

(संदर्भ- केशवराव जेधे चरित्र, लेखक, य. दि. फडके)

-गप्पाजीराव

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस