शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

किस्सा खुर्ची का - पुण्याचे आमदार, ठाण्याचे खासदार

By यदू जोशी | Updated: April 12, 2024 12:07 IST

हल्ली सगळेच आमदार, खासदार त्यांचे कार्य अहवाल प्रकाशित करत असतात. पण त्याची सुरुवात केली ती रामभाऊंनी.

यदु जोशीते पुणे शहरात तीन वेळा आमदार होते, तिथेच वकिली करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनसंघ आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास. निष्कलंक चारित्र्याचे धनी असलेले रामभाऊ म्हाळगी हे आजही महाराष्ट्रातील भाजप परिवारात दीपस्तंभ मानले जातात. खरे तर त्यांना पुण्यातच राजकारण करायचे होते, तिथे ते आमदारही झाले, पण १९७७ च्या जनता लाटेत जनसंघाने आदेश दिला की ठाणे लोकसभा मतदारसंघात लढा. पुण्यावर त्यांचा नैसर्गिक दावा होता, पण तेव्हाचे समाजवादी नेते मोहन धारिया यांना पुण्यातून लढवायचा निर्णय झाला आणि रामभाऊ ठाण्यात गेले. तेथे जिंकलेदेखील. जनता लाटेचा त्यांना फायदा झाला हे खरे असले तरी १९८० मध्ये आलेल्या इंदिरा लाटेत देशातील जनता पक्ष, भाजपचे अनेक दिग्गज पराभूत झाले, पण रामभाऊंनी ठाण्याचा गड राखला. 

हल्ली सगळेच आमदार, खासदार त्यांचे कार्य अहवाल प्रकाशित करत असतात. पण त्याची सुरुवात केली ती रामभाऊंनी. ते दरवर्षी त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामगिरीचा अहवाल मतदारांसमोर सादर करत. जनतेशी निगडीत असा कोणताही विषय नव्हता, जो त्यांनी धसास लावण्याचा प्रयत्न केला नाही. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बेडकांना मारून त्यांचे पाय निर्यात करण्याचे प्रकार खूप वाढीस लागले होते. तेव्हा त्यांनी या विषयाचा अभ्यास केला, बेडकांना मारणे हे शेतीसाठी कसे मारक आहे याची मांडणी संसदीय समितीसमोर केली आणि ते प्रकार रोखले. असे एरवी लोकप्रतिनिधींना न सुचणारे विषयही त्यांनी हाताळले. लोकसंग्रहासाठी वेळप्रसंगी संताप गिळण्याची सवय नेत्यांनी लावून घेतली पाहिजे असे ते म्हणत.जनसंघाचे खासदार त्या वेळी कमी होते म्हणून राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये त्यांनी स्वत:ची जनसंपर्क कार्यालये सुरू केली होती. त्यातून ते स्थानिक नागरिक, कार्यकर्ते यांचे प्रश्न मार्गी लावत. एखाद्या मतदाराचे गाऱ्हाणे त्यांनी विधानसभेत वा संसदेत मांडले तर त्याला काय उत्तर मिळाले, ते त्या मतदाराला कागदपत्रांसह पाठवत असत. ते सतत कार्यमग्न असत. भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा नसतो तर वेळेचा अपव्यय हाही एक प्रकारचा भ्रष्ट आचार आहे असे ते म्हणत. ते नियमितपणे दैनंदिनी लिहीत असत. प्रामाणिक इच्छाशक्ती, अखंड निर्धार आणि चिवट प्रयत्नशीलता या आधारावर यशस्वी होता येते, असे त्यांच्या दैनंदिनीच्या सुरुवातीला ठळकपणे लिहिलेले असायचे. निवडणुकीत जिंकलो तर काय करायचे याचे नियोजन अनेकांकडे असते, पण हरलो तर काय करायचे याचे नियोजनदेखील रामभाऊंकडे आधीच केलेले असायचे.

१९८० मध्ये ते लोकसभा जिंकले. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी जाहीर केले की १९८१ मध्ये मला वयाची साठ वर्षे पूर्ण होतील. मात्र, माझी खासदारकी १९८५ पर्यंत आहे, तोवर मी खासदार राहणार आणि नंतर कोणतीही निवडणूक लढणार नाही. मला सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्तम कार्यकर्ते तयार व्हावेत यासाठी संस्था उभारायची आहे. ज्येष्ठ संघ स्वयंसेवक नानाजी देशमुख यांचा आदर्श त्या बाबतीत त्यांच्यासमोर होता. मात्र, रामभाऊ म्हाळगी यांचे १९८२ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी संघ, भाजप परिवाराने मुंबईजवळील उत्तन येथे प्रशिक्षण संस्थेची उभारणी केली, आज तीच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी देशात नावारूपास आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Puneपुणेthaneठाणे