शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

खोरच्या ग्रामसभेत खडाजंगी

By admin | Updated: August 17, 2016 01:02 IST

येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोठी खडाजंगी झाली. खोर हे गाव सांसद आदर्श योजनेंतर्गत खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतले

खोर : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोठी खडाजंगी झाली. खोर हे गाव सांसद आदर्श योजनेंतर्गत खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतले असल्याने या पार्श्वभूमीवर आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार उत्तम दिघे हे ग्रामसभेस उपस्थित राहिले होते.या वेळी ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर व सरपंच रामचंद्र चौधरी यांनी अहवाल वाचन करून ग्रामसभेंतर्गत येणारे प्रश्न व त्यावरील उपाययोजना याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर उत्तम दिघे यांनी सांसद आदर्श योजनेच्या संदर्भात कोण-कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे या विषयीची माहिती दिली. अहवाल वाचन पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थ सुहास चौधरी यांनी भ्रष्टाचारमुक्त गाव व ग्रामपंचायत सदस्य व्हावे यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घ्यावा व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजाच्या वेळा देखील ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर कुल समर्थक विकास चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या चाललेल्या बोगस कारभारावरती हात घातल्याने एकच खळबळ उडाली. विकास चौधरी यांनी या वर्षी कोण-कोणती विकासाची कामे झाली, त्यानुसार त्या कामाला किती खर्च अपेक्षित होता व किती खर्च करण्यात आला याविषयी माहिती बिलासह देण्याची मागणी सरपंच रामचंद्र चौधरी व ग्रामविकास अधिकारी अंकुश लोणकर यांच्याकडे केली. ग्रामसेवकांना वेळोवेळी प्रस्ताव देऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. शौचालयाच्या नोंदी केल्या जात नाहीत, तसेच ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील ग्रामपंचायतीने दिली नसल्याचे विकास चौधरी म्हणाले. यानंतर लगेचच ग्रामसभेचे वातावरण तापले व तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासमोरच कुल-थोरात गटात समर्थकांमध्ये खडाजंगीला सुरुवात झाली. आमने-सामने आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. आताच जर असे हेवेदावे होत असतील तर सांसद आदर्श गावासाठी खोर गावाची निवडच करू नका, त्यानुसार ठरावदेखील ग्रामसभेत घ्या, असे थोरात समर्थक मोहन डोंबे म्हणाले. मागील पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सरपंच पदावर असणाऱ्यांनी कोऱ्या चेकवर सह्या केल्या, मात्र आताचे चाललेले पंचवार्षिक योजनेचे कामकाज हे विरोधकांना पाहवत नसल्याचे डोंबे म्हणाले आहे. या सर्व प्रश्नाला उत्तर देत व सामंजस्याची भूमिका सरपंच रामचंद्र चौधरी यांनी घेतली व त्यांनी सांसद आदर्श योजनेसाठी खोर गावाची निवड केली आहे, ती केवळ माझ्या एकट्यासाठी केलेली नसून, गावाचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. (वार्ताहर)