शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...तर कंगना बरोबर आहे; वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 19:11 IST

सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे

पुणे: 2014 पासून नरेंद्र मोदींनी (narendra modi) केलेल्या कामावर खुश होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळायला लागला, असे कंगना राणावतला म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे. पण त्यासाठी 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून (chandrakant patil) अभिनेत्री कंगना राणावतची (kangana ranaut) पाठराखण करण्यात आली. 

सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली, " स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल तर ते स्वातंत्र्य असू शकतं का ? 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले"  या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येते. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना कंगना राणावतच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. परंतु तिचे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. 

देशात नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो.  दोन वेळचे जेवण मिळत नाही असा माणूसच आता देशात राहिला नाही. 105 रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे, घरं मिळतायत, स्वच्छतागृह अशी मोठी यादी आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खूष होऊन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत असेल तर ते बरोबर आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी कंगना राणावतची पाठराखण केली. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेBJPभाजपा