शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जुन्नरचा पर्यटन विकास कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 01:28 IST

ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले.

पुणे - ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले. मात्र, या संदर्भातील अध्यादेश काढल्यानंतर शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्नरचा पर्यटनाच्या अंगाने होणारा विकास कागदावरच आहे.जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल,अशी अपेक्षा होती.मात्र,अद्याप जुन्नरचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच या भागात कोणत्या सोई-सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, जुन्नर तालुक्यामध्ये केवळ एक केंद्र सुरू आहे.जुन्नरचा विचार करता या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला व इतर ऐतिहासिक किल्ले आहेत.तसेच १५० वर्षाची परंपरा असलेला अणे उत्सव असून ३५० वर्षाची परंपरा असलेला बेल्हे गावचा आठवडे बाजार आहे.त्याचप्रमाणे खोडद येथे जागतिक महादूर्बिण आहे.1 जुन्नर तालुक्यात शिवनेरीसह निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले आहेत. सर्वाधिक ३५० लेण्या असून अष्टविनायकापैकी लेण्याद्री,ओझर ही दोन अष्टविनायक मंदिरे आहेत.तसेच ३ हेमाडपंथी बंधणीतील कोरीव पुरातन मंदीरे आहेत. तसेच नाणेघाट-घाटघर, दर्याघाट, आणेघाट- आणे असे निसर्ग रम्य घाट व प्रसिध्द धबधबे आहेत.2 त्याचप्रमाणे विविध पठारे तसेच गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फुट खोल असलेले कोकणकडे आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक लहान मोठी ठिकाणे जुन्नरमध्ये आहेत. त्यात माणिकडोह गावातील कुकडी नदी, पुरातन काळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख बोरीगावत आहे. तमाशाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव ,बिबट्या निवारण केंद्रही पर्यटकांना आर्कषित करते.3 एमटीडीसीने जुन्नरमध्ये विविध विकास कामे हाती घेण्यासाठी काही जागांची पाहाणी केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या सहकार्याने या तालुक्याचा विकास आराखडा तयार केला जाणार होता. मात्र,अद्याप आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही,अशी माहिती सूत्रांनी दिली.पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्यास त्याचा फायदा संबंधित गाव व जिल्ह्याला मिळत असला तरीदेखील कुचकामी सरकारीयंत्रणेमुळे काही खासगी व्यावसायिकांची अरेरावी पर्यटनस्थळांवर दिसून येते.गेल्या काही वर्षांमध्ये इको टूरिझमची संकल्पना वाढीस लागली असताना त्या संकल्पनेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने सध्या पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते.जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आज घडीला केवळ एक केंद्र सुरू असल्याचे चित्र पाहायलामिळत आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरtourismपर्यटन