शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 21:15 IST

बारामतीत व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन.

बारामती- पत्रकारीतेमध्ये आज अनेक नवीन आव्हाने आहेत. एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे. मात्र, पत्रकारांनी सत्य, योग्य असेल तेच मांडावे. कोणाच्या दमदाटीवरुन,सुचनेवरुन लेखणी चालवु नये,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती येथे आयोजित पत्रकारांच्या ‘व्हाइस आॅफ मिडीयाच्या राज्य शिखर अधिवेशनात ते बाेलत होते.यावेळी कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे,खासदार कुमार केतकर,ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार,जयश्री खाडीलकर,प्रकाश पोहरे,कुमार सप्तर्षी,माजी  मंत्री हर्षवर्धन पाटील,कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार आदी  उपसथित होते.

यावेळी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील सारस्वतांचा,वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या व्यक्तींचा  व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते  पवार, माजी केंद्रीय मंत्री  सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री पवार बोलत होते.

ते म्हणाले की, पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थीत राहिलो आहे.माझे महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडिलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले. नेता , काॅंग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणींना पवार यांनी उजाळा दिला.

माजी केंद्रीय मंत्र सुशीलकुमार शिंदे म्हणाले, गेल्या तीन - चार वर्षात देशाची सामाजिक परिस्थीती बिघडत आहे. त्यात सुधार करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

खासदार कुमार केतकर यांचे यावेळी भाषण झाले. जाती -पाती मध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहे. आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही.२०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतर पिक्चर मोठा राहणार असल्याचे केतकर म्हणाले.

संपुर्ण देशाचे चित्र समोर ठेवल्यास मोदींच्या नेतत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत. देशात ६० टक्केपेक्षा अधिक देशातील राज्य आज भाजपच्या हातात नाही. गोवा मध्ये तोडफोड झाली, महाराष्ट्र मध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली.यानंतर होणार्या निवडणुकीत लोक काय निर्णय घेतील,याबद्दल  बोलणे योग्य ठरणार  नाही.मात्र, देशातील बदल स्पष्ट दिसत आहे.या सगळ्या स`थितीत  लोकांची अस्वस`थता मांडण्यासाठी पत्रकारीता हे एकमेव माध्यम आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रमाणे पत्रकारीतेची आज खरी गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.दरवर्षी पंतप्रधान दिवाळी सण काश्मीरमध्ये जवानांबरोबर घालवतात,असे चित्र आपण पाहतो.  ६ वर्षापुर्वी पंतप्रधानमंत्र्यांनी काश्मीरला जाऊन काश्मीरचा चेहरा बदलणारे कार्यक्रम जाहीर केले.त्यानंतर ते ५ वर्ष  दिवाळीत काश्मीरला गेले.मात्र, दरवेळी जवानांबरोबर वेळ दिला.मात्र,काश्मीरच्या लोकांचे मुलभुत प्रश्नासाठी  जनतेसमोर कार्यक्रम मांडले,त्यातील एकाही कार्यक्रम कोणत्याही प्रकारे  सोडवणुक करण्यासाठी पाऊल टाकले नाही,असा अनुभव अनेक वेळचा आहे,याही दिवाळीचा सुध्दा तो आहे.त्यामुळे चित्र गंभीर असल्याची चिंता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Baramatiबारामती