शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 18:12 IST

काही दिवसापूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते.

Jayant Patil ( Marathi News ) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.  तसेच परमबीर सिंह यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही आरोप केले होते. 'जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, आता जयंत पाटील यांनी या आरोपला प्रत्युत्तर दिले. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा हडपसर येथे आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 

बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते काय बोलत आहेत, या विषयी मला जरा देखील माहिती नाही. मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का? मी त्यांना असं का सांगू, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. 

"पक्ष कधीच कोणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली? आरोप होऊन किती वर्ष झाली, ३ वर्षानंतर काही गोष्टी सांगत असतील तर त्याकडे किती लक्ष द्यायचं, फक्त परमवीर सिंह यांची चौकशी सुरू आहे ती व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा, असंही जयंत पाटील म्हणाले. 

'मनोज जरंगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात'

आज मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. सल्ला मानून काम करत नाहीत, मला वाटत यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.

सरकारने कधीच प्रकल्प थांबवले नाहीत

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिंद्र कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. " गुजरातला काही जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाही, आमचे अनेक प्रकल्प तिकडे गेले आहेत, आमच्या सरकारने कधीच थांबवलं नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलParam Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिस