शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 18:12 IST

काही दिवसापूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते.

Jayant Patil ( Marathi News ) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.  तसेच परमबीर सिंह यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही आरोप केले होते. 'जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, आता जयंत पाटील यांनी या आरोपला प्रत्युत्तर दिले. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा हडपसर येथे आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 

बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते काय बोलत आहेत, या विषयी मला जरा देखील माहिती नाही. मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का? मी त्यांना असं का सांगू, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. 

"पक्ष कधीच कोणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली? आरोप होऊन किती वर्ष झाली, ३ वर्षानंतर काही गोष्टी सांगत असतील तर त्याकडे किती लक्ष द्यायचं, फक्त परमवीर सिंह यांची चौकशी सुरू आहे ती व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा, असंही जयंत पाटील म्हणाले. 

'मनोज जरंगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात'

आज मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. सल्ला मानून काम करत नाहीत, मला वाटत यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.

सरकारने कधीच प्रकल्प थांबवले नाहीत

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिंद्र कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. " गुजरातला काही जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाही, आमचे अनेक प्रकल्प तिकडे गेले आहेत, आमच्या सरकारने कधीच थांबवलं नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलParam Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिस