शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

होमस्कुलिंग करणाऱ्या जान्हवी पतकीला दहावीत ८४ टक्के गुण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 9:35 AM

शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत यश संपादित केले आहे. 

पुणे : शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत यश संपादित केले आहे. 

शिक्षणासाठी शाळाच आवश्यक आहे अशी सर्वसाधारण धारणा असताना जान्हवीचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. यात तिचे शिक्षक बनलेले वडील ऋतुराज  आणि आई नीलिमा यांचा मोठा वाटा आहे. इयत्ता दुसरीपासून, घरून शाळाबाह्य शिक्षण घेऊन पहिल्यांदाच दहावीला ती अधिकृत परीक्षेला सामोरी गेली. मात्र केलेल्या शाळेत न जात घरी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर ती उत्तम गुणांनी  उत्तीर्ण झाली आहे. जान्हवीने कोल्हापूर विभागातून परीक्षा दिली होती. 

   याबाबत तिचे वडील म्हणाले की, मुळात मी आणि माझ्या पत्नीने आमचे शिक्षण पारंपरिक पद्धतीनेच पूर्ण केले होते. त्यामुळेच शाळा चाकोरीबद्ध शिक्षणाच्या संकल्पना मोडून तिला विचारांना चालना मिळेल असा आमचा विचार होता. घोकंपट्टीसोडून तिला मुळातून विषय समजावेत अशी आमची इच्छा होती आणि त्यामुळेच तिला घरी शिकवण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही व्यवसाय करत असल्यामुळे तिला पुरेसा वेळही देऊ शकलो. फक्त एसएससी नाही तर आयसीएसई आणि सिबीएसई बोर्डाच्या पुस्तकांचाही अभ्यास तिने केला. 

 तिच्या आई म्हणाल्या की, ' सुरुवातील आम्हालाही हा प्रयोग करताना धाकधूक होतीच. शिवाय अगदी घरातूनही आमच्या प्रयोगावर शंका उपस्थित झाल्या होत्या. मात्र तिला पूर्ण समजेल असे प्रयोगातून आम्ही शिक्षण दिले आणि आज त्याचे फळ मिळाले आहे. घरात शिकवताना आम्ही तिला जास्तीत जास्त गोष्टींना अनुभव देण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या देशात फिरताना तिथली घरं, माती, शेतीच्या पद्धती असे अनेक मुद्दे तिला अनुभवातून आकलन झाले. शाळा नसली तर मित्र- मैत्रिणी नसतील का किंवा ती एकलकोंडी होईल का असाही मुद्दा अनेकांनी मांडला होता. मात्र असं काहीही झालं नाही. आज तिला एकच नाही तर अनेक शाळांमधले मित्र-मैत्रिणी आहेत. शेवटी मैत्री ही परस्पर वागण्यातून जपली जाते. 

 

शाळेचे बंधन नाही,अभ्यासाचा आनंद होता

या निकालाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, 'मला अभ्यास करताना शाळेचे बंधन नाही तर खूप खूप आनंद मिळाला. मी कितीतरी नवीन गोष्टी रोज शिकत होते. मला नाही समजलं तर आम्ही तो विषय समजेपर्यंत शिकत असू. त्यामुळे आज माझ्या सगळ्या संकल्पना स्पष्ट आहेत. मला पहिल्यांदा परीक्षा, पुरवणी, हॉलतिकीट अशा गोष्टी दहावीत समजल्या. आज मिळालेल्या यशात माझ्या इतकाच वाटा आई बाबांचा आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण