शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

जनाई-शिरसाई पाणीप्रश्न पेटला, उंडवडीत शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 1:06 AM

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले.

सुपे : बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.गुरुवारपासून बारामती-पाटस रस्त्यावरील बस स्थानकाजवळ जनाई-शिरसाईचे पाणी सोडण्यासंदर्भात चक्री उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या वेळी शेतक-यांनी जागरण-गोंधळ घालून चक्री उपोषण केले. शनिवारी तिसºया दिवशी महिलांसह शेळ्यामेंढ्या उपोषण स्थळी आणल्या होत्या.दरम्यान, या योजनेचे कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, उपअभियंता ए. एल. राऊत यांनी शुक्रवारी शेतकºयांशी संवाद साधला. मात्र, चर्चा निष्फळ ठरली. तर, शनिवारी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र, शेतक-यांशी संवाद न साधताच ते निघून गेल्याने उपोषणकर्ते चिडले असल्याने उपोषण तीव्र होण्याचे संकेत आहेत.या शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी उंडवडी क.प., जराडवाडी, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, सुपे, गोजुबावी, कारखेल, साबळेवाडी, अंजनगाव, बºहाणपूर, काळखैरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिल्याची माहिती उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी दिली.पाण्याच्या नियोजनाची मागणी...बारामतीच्या जिरायती पट्ट्यात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर या भागाला वरदान ठरत असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभपट्ट्यात हक्काचे पाणी सोडून कायमस्वरूपी नियोजित आवर्तन द्यावेत, अशी मागणी शेतकºयांची आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी