शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक, ती आता सुधारा अन् आढळरावांना विजयी करा - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:39 IST

कोल्हे कधी कोणाला भेटले नाहीत, कारण त्यांना सेलिब्रिटीमध्ये रस होता

ओतूर : पाच वर्षांपूर्वी मी तुम्हाला न विचारता अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली. जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून उमेदवारी देण्याचा मी अभ्यास केला लगेच जाहीर केलं; पण नंतर पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला, कधी माझ्या आदिवासी भागात आले नाहीत. कधी कुणाला भेटले नाहीत. कारण स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता. मित्रांनो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली आहे, ती चूक सुधारा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर येथील सभेत केली.

केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता, पाच वर्षांचा बॅकलॉग आपल्याला भरून काढण्यासाठी आढळराव यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न, पर्यटन, हिरडा प्रश्न, दिवसा वीज यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

कामाचा माणूस व बिनाकामाचा माणूस ओतूरकरांनी नाव दिले आहे. ते कालवा समितीच्या एकाही बैठकीला आले नाहीत. कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले. ॲक्टर लोकांचा धंदा आहे पैसा घ्यायचा, कुठेही नाचायचे, अशी टीका करून बेनके यांनी पुढे बोलताना सागितले की, प्रत्येक गावात विकासकामांसाठी मी कटिबद्ध आहे व या जुन्नर तालुक्यातून आढळराव पाटलांना तीस हजारांचे मताधिक्य देणार असे आमदार अतुल बेनके यांनी सागितले.

एवढा मोठा जनसमुदाय पाहता ४ तारखेला काय निकाल लागेल, सांगायची गरज नाही, अमोल कोल्हे यांनी पाच वर्षांत काय केले नाही, त्यांनी जनतेकडे पाठ फिरवली. कुठल्याच गावात गेले नाही, निधी दिला नाही, काही विकास केला नाही, नाटके करणारा माणूस अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

खासदारांच्या दत्तक गावाला मी पाणी टँकर सुरू केला

मी मोठ्या प्रमाणात बैलगाडा घाट बांधायचे काम केले. चार वर्षांच्या संघर्षानंतर बैलगाडी शर्यतीची बंदी उठली. बैलगाडे चालू करण्यासाठी सात ते आठवेळा आंदोलने केली. माझ्यावर केस झाल्या. मी दत्तक घेतलेल्या गाव करंडी येथे १७ कोटींची विकासकामे केली व त्यांनी कोपरे मांडवे गाव दत्तक घेतले. तिथे कधी गेले का? मी त्या गावाला पाणी टँकर सुरू केले, हा फरक कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस अशी टीका करून आढळराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दीड वर्षात पंधराशे कोटी रुपये गावागावांत आणले, पूर्ण मतदारसंघात काम करण्यासाठी ४५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे येणारा खासदार नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा येणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे