शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:45 IST

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राज्यात रंगली असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे दोन्ही गट एकत्र येत असतील तर आनंदच आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

पुण्यात सिंचन भवन येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर विखे-पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे आणि आता दोन्ही गट एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घ्यावा असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल; कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे, हेच मला माहीत नाही.

याच बैठकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हेदेखील उपस्थित होते. त्यांना शरद पवार यांच्या विधानाबाबत विचारले असता त्यांनी, सोलापूरचे आम्ही चारही आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तसेच पवार यांच्याशीही याविषयी बोलणे झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर ताकद वाढेल, असे सांगितले. अजित पवार यांच्यावर टीका करूनही, त्यांनी मला नेहमी विकासकामांत साथ दिली. माझ्या मतदारसंघात काम केली, पाणी दिले. माझ्या मतदारसंघात कामे करताना त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. मतदारसंघात काम असतात, अडचणी असतात, त्यामुळे सरकारची गरज असतेच, असे सांगून जानकर यांनी शेवटी पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील