शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नव्हे", अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:27 IST

मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे

पुणे: गेल्या नऊ वर्षात प्रशासन प्रतीकवादी, तर माध्यमे प्रतिक्रियावादी झाली आहेत. न्यायपालिका व स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर अनेकदा शंका उपस्थित होत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नाही, असे परखड मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कॅलिडस मीडिया अँड आर्टस् अकॅडमीतर्फे 'भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचे महत्व' या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, संसदीय चर्चेतून नागरिकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यातून अनेक धोरणात्मक कार्याची उभारणी होते. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात लोकशाही सुदृढ होण्यासाठी सर्वसमावेशक संसदीय चर्चा अत्यंत गरजेची आहे. मात्र, सध्या संसदीय चर्चेचे महत्व कमी होतेय का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे," "संसदीय चर्चेत अनेक आयुधे आहेत. त्याचा बखुबीने वापर करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. अभ्यासू नेते घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते"

ॲड. असीम सरोदे म्हणाले, "लोकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. सगळे प्रश्न न्यायालयात सुटत नाहीत, काही प्रश्न धोरणात्मक पातळीवर संवादातून सुटतात. संसदीय प्रणालीत चर्चा होऊन प्रश्न सुटायला हवेत. लोकांचा सहभाग त्यात असायला हवा. बहुमताच्या जोरावर अनेक विधेयके चर्चेविना रेटून नेले जातात, हे योग्य नाही. लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न घटनेला धोकादायक आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त भारतासाठी आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला हवे. एक दिवसाचा राजा आणि इतर दिवसांचा सामान्य नागरिक ही मतदारांची ओळख पुसायला हवी."

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस