शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:26 IST

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही

- जयवंत गंधालेहडपसर : हडपसर परिसरातील छोट्या कालव्यांतून पिण्याची पाण्याची वहिनी गेली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. पिण्याच्या पाण्याची वहिनी कचऱ्यामध्ये गाडली गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हडपसर परिसरातली ही जीबीएसचा धोका उद्भवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही. कोरड्या पडलेल्या कालव्यात मात्र कचऱ्याचे ढीग च्या ढीग उभे राहिले आहेत. सिंहगड रस्ता धायरी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात जीबीएस ह्या नवीन आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे तसाच धोका हडपसर परिसरात देखील होईल अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कालव्यात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंड करण्यात यावा जेणेकरून कालव्यात कोणीही कचरा टाकणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उपद्रवी नागरिकांना शिस्त लागेल अशी भावना हिरालाल अग्रवाल यांनी मांडली. आरोग्य अधिकारी म्हणतात की, कालव्याची स्वच्छ करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे असे बोलून वेळ मारून देतात. त्यामुळे कालवा परिसर, साडेतेरा नळी, रामोशी आळी, पांढरे मळा, गाडीतील, साने गुरुजी रुग्णालय मागील परिसर, साडे सतरा नळी येथेपर्यंत संपूर्ण कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. 

वारंवार तक्रारी करूनदेखील आरोग्य विभाग , वरिष्ठ आरोग्य अधिकारी , कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. घनकचरा विभागातर्फे डीप क्लीन संकल्पना राबविली जात आहे. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून फिरवले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र हडपसर मध्ये डीप क्लीन कालवा परिसरात का नाही झाले याचे उत्तर द्यावे. - संदीप निगडेअस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार होतात.त्याचा खर्च ही सर्व सामान्य नागरिकाला परवडत नाही . मूलभूत गोष्टी आम्हाला वांरवार हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे जाऊन तक्रार नोंदवावी लागते .आरोग्य अधिकारी कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. त्यामुळे हडपसर बकाल होत चालले आहे. - किरण बोरावके, शेवाळेवाडी ग्रामस्थ  

हडपसरमधील कालवे यांची दररोज स्वच्छता करावी. नागरिकांना आणि अधिकारी यांना शिस्तीचे धडे द्यावेत. कालव्यातील पाणी शेतीला वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिक अधिकारी सर्वांनी कायद्याचे पालन करावे. -बाळासाहेब भिसे, शेतकरीकचरा संकलन सूक्ष्म व्यवस्थापन योजना आखून प्रत्येक नागरिकांना कडून कचरा उचलण्याची सोय नागरिकांना करून द्यावी, जेणे करून नागरिक बाहेर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकणार नाही. यासाठी नागरिक, पुणे मनपा, स्वच्छतादुत, कचरा वेचक यांच्यात समन्वय साधावा. -दीपाली माटे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण